रब्बीच्या पिकांवर वन्यप्राण्यांचे संकट; सोयगाव शिवारातील प्रकार--- 'ऑनलाइन तक्रारी' साठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळेना !
सोयगाव, दिलीप शिंदे, दि.२१... जंगलाच्या पायथ्याशी असलेल्या सोयगाव शेती शिवारातील रब्बीच्या पिकांवर ऐन कापणीच्या हंगामात वन्यप्राण्यांच्या मुक्त संचारा मुळे रब्बी हंगाम अडचणीत आला आहे सोयगावच्या जंगलात रोही, हरीण, मोर, रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांच्या कळप मुक्तसंचार करून कापणीवर आलेली पिकं आडवी करत आहे वन्यप्राण्यांच्या या नुकसानीच्या भरपाईसाठी मात्र ऑनलाइन तक्रारीचा ससेमिरा असल्याने बाधित शेतकऱ्यांना या ऑनलाइन तक्रारी बाबत वनविभागाच्या वतीने मात्र जनजागृती करण्यात येत नाही त्यातच तक्रारी ची संकेतस्थळ बंद अवस्थेत राहत असल्याने सोयगाव च्या रब्बी उत्पादक शेतकऱ्यांना रब्बीचा हंगाम उत्पन्नासाठी अडचणींचा ठरला आहे.
सोयगाव शिवाराला लागून वेताळवाडी, अजिंठ्याच्या डोंगर यासह घनदाट जंगल आहे या जंगलात अजिंठ्याच्या डोंगर रांगातून वन्यप्राण्यांच्या कळप शेती शिवारात आली आहे ऐन कापणीच्या कालावधीत या वन्यप्राण्यांच्या कळपा कडून पिकांची नुकसान करून पिकांना आडवी करत आहे त्यामुळे सोयगाव शिवारात मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे दरम्यान वनविभागाच्या पथकाकडून मात्र 'ऑनलाइन तक्रार' केल्या शिवाय नुकसानीचा पंचनामा केल्या जात नाही त्यामुळे या जाचक अटी मुळे शेतकरी हताश झाला आहे.
वनविभागाच्या पथकांनी या नुकसानी चा पंचनामा ऑनलाइन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
------सोयगाव शिवारात रब्बीच्या हंगामाची तब्बल १२०८ हेक्टरवर पेरणी झाली आहे यामध्ये भाजीपाला क्षेत्रात मोठी वाढ झालेली आहे उन्हाळी पिकांचीही लागवड करण्यात आली आहे मात्र वन्यप्राणी या पिकांची नासाडी करत आहे...
No comments:
Post a Comment