Saturday 27 May 2023

जल जीवन मिशन योजनेच्या जनजागृतीच्या प्रचार रथाचे अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये यांच्या हस्ते शुभारंभ !!

जल जीवन मिशन योजनेच्या जनजागृतीच्या प्रचार रथाचे अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये यांच्या हस्ते शुभारंभ !!

ठाणे, प्रतिनिधी : वसुंधरा संजीवनी मंडळ व भारतीय जैन संघटना यांच्या वतीने ठाणे जिल्ह्यात जलयुक्त शिवार अंतर्गत होणाऱ्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि जल जीवन मिशन योजनेच्या जनजागृतीसाठी प्रचार रथाला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये झेंडा दाखवून यात्रेचा शुभारंभ केला.

यावेळी  विभागीय वन अधिकारी कांचन पवार, उपजिल्हाधिकारी दिपक चव्हाण, तहसिलदार राजाराम तवटे, ठाणे जिल्हा परिषदचे जिल्हा जलसंधारण अधिकारी दिलीप जोकार, वसुंधरा संजीवनी मंडळ संस्थापक आनंद जी भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतंर्गत पहिल्या टप्यात ठाणे जिल्हयातील कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, भिवंडी या तालुक्यातील 72 तलावातील गाळ काढण्यात येणार आहे.

तलावांचे पुनरुज्जीवन करण्याची सुवर्णसंधी !

संपूर्ण देशभरात पाण्याचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पाणी हेच जीवन आहे. प्रत्येक गावाला पिण्यासाठी, शेतीसाठी तसेच पशूंसाठी सातत्याने पाण्याची गरज असते. हवामानामध्ये तीव्र गतीने बदल होत चालले आहेत. पाऊस पडणे बेभरवशाचे झाले आहे. या संकटाला सामोरे जायचे असेल, तर प्रत्येक गावाने पाण्यासाठी आत्मनिर्भर होण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.

प्रत्येक गावामध्ये / तालुक्यामध्ये पाणी साठविण्यासाठी विहिरी, गाव तलाव, पाझर तलाव तसेच लहान-मोठे तलाव व धरणे आहेत. बऱ्याच ठिकाणी तलावांमध्ये गाळ साचतच असतो त्यामुळे पाणी साठविण्याची क्षमता कमी होते. जर आपल्या गावाला जल आत्मनिर्भर करावयाचे असेल, तर या सर्व जलसाठ्यांमधून गाळ काढणे त्यांची कायमस्वरूपी निगा राखणे, पाण्याचा अपव्यय टाळून योग्य नियोजन करणे नितांत आवश्यक आहे.

'जलयुक्त शिवार तसेच 'जल जीवन मिशन या योजनांच्या माध्यमातून वरील सर्व कामे सहजरीतीने करता येऊ शकतात. यासाठी ग्रामपंचायतींना व पाणी समित्यांना योग्य ते प्रशिक्षण देऊन सक्षम केल्यास, आपल्या परिसरातील सर्व तलावांचा गाळ प्रशासनाच्या माध्यमाने काढला जाऊ शकतो व निगा राखण्याचे कायमस्वरूपाचे काम केले जाऊ शकते. 

ज्या ग्रामपंचायती आपले गाव 'जल-आत्मनिर्भर' करण्यासाठीची ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार असतील, अशा ग्रामपंचायतीकडून 
https://bjsindia.org/mwsd किंवा https://gf3f4aec40f890c-appprod.adb.ap-mumbai-1.oraclecloudapps.com/ords/r/mission100/mission100/login मागणी अर्ज मागविण्यात येत आहेत.

No comments:

Post a Comment

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) यांच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांची अवहेलना !! पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील प्रत्येक घडामोडींचे...