Wednesday 30 August 2023

आज उद्या मुंबईत इंडिया आघाडीची तिसरी बैठक !!

आज उद्या मुंबईत इंडिया आघाडीची तिसरी बैठक !!

*भाजपची हुकूमशाही प्रवृत्ती आणि जुमलेबाजीच्या विरोधात इंडिया आघाडी*


मुंबई, प्रतिनिधी : इंडिया आघाडीची मुंबईत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी तिसरी बैठक पार पडणार आहे. याच बैठकीच्या निमित्ताने आज (30 ऑगस्ट) एक पत्रकार परिषद पार पडली. ज्याला राष्ट्रवादीचे शरद पवार, सुप्रिया सुळे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, कॉग्रेसचे नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील हे नेते हजर होते.

'आमच्याकडे पंतप्रधान बनण्यासाठी अनेक पर्याय आहेत. भाजपकडे मोदी सोडून काय पर्याय आहे?' असा खडा सवाल इंडियाच्या नेत्यांनी केला. भाजपची हुकूमशाही प्रवृत्ती आणि जुमलेबाजीच्या जोखडापासून भारतमातेचे आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी देशभक्त पक्ष एकवटले आहेत. देशभरातील 28 पक्ष एकत्र आले आहेत असे सांगताना आमची इंडिया आघाडी भक्कमपणे वाटचाल करत आहे आणि येत्या निवडणुकीत देशात निश्चितपणे परिवर्तन घडणार आहे, असा ठाम विश्वास या नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी ‘वेगवेगळे पक्ष आहेत ही गोष्ट खरी आहे. पण बसून किमान समान कार्यक्रम ठरवून आम्ही तयार करू शकतो. या आधारेच आपणच पुढे जाऊ शकतो.’ असं मोठं विधान शरद पवारांनी यावेळी केलं आहे. 

देशातील जनतेला आता परिवर्तन हवे असून अनेक राज्यांमधून इंडिया आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. विविध 28 राजकीय पक्ष आणि त्यांचे 63 प्रतिनिधी इंडिया बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकांमधून एक पर्यायी व्यासपीठ तयार होऊन देशात आवश्यक असलेल्या परिवर्तनासाठी मजबुतीने उभा राहील, हेच आम्ही करणार आहोत, असे शरद पवार यांनी पुढे सांगितले.

बंगळुरू येथे झालेल्या बैठकीत 'इंडिया'चे 26 घटक पक्ष होते. महाराष्ट्रात आल्यावर ही संख्या 28 वर पोहोचली आहे. 'इंडिया' वाढत आहे आणि हीच वाढ कायम राहून चीन मागे हटेल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

ऐतिहासिक इंडिया बैठकीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेची सुरुवात करताना संजय राऊत यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. पाटणा आणि बंगळुरूनंतर इंडियाची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. पहिल्या दोन बैठकीतच केंद्र सरकारने स्वयंपाकाचा गॅस 200 रुपयांनी कमी केला ही इंडियाची ताकद आहे, असे संजय राऊत म्हणाले.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे (JDU) अध्यक्ष नितीशकुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, माकपचे सीताराम येचुरी, नॅशनल काॅन्फरन्सचे फारूक अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आणि इतर अनेक नेते या बैठकीसाठी उपस्थित राहतील.


No comments:

Post a Comment

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !!

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !! चोपडा, प्रतिनिधी.. गेल्या दहा वर्षापासून सत्तेत असल...