Monday, 25 September 2023

संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित धायरी येथे रक्तदान शिबिरामध्ये १६१ निरंकारी भक्तांनी केले रक्तदान !!

संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित धायरी येथे रक्तदान शिबिरामध्ये १६१ निरंकारी भक्तांनी केले रक्तदान !!

रक्तदान हि मानवतेची सर्वोच्च सेवा : १६१ निरंकारी भक्तांनी केले रक्तदान...

धायरी ब्रांच २४ सप्टेंबर २०२३ :  

            सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील ब्रांच धायरी येथे संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन २४ सप्टेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. ज्यामध्ये १६१ निरंकारी भक्तांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले, संत निरंकारी रक्तपेढी व ससून रुग्णालय रक्तपेढी पुणे यांनी १६१ युनिट रक्त संकलन केले.
            या शिबिराचे उदघाटन आदरणीय श्री ताराचंद करमचंदानी जी झोनल प्रमुख पुणे झोन यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या रक्तदान शिबिराला मा. आमदार भीमराव आण्णा तापकीर तसेच अतुल चाकणकर सामाजिक कार्यकर्ते यांनी सदिच्छा भेट देऊन मिशनच्या कार्याचे कौतुक केले.
            संत निरंकारी मिशनद्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे नोव्हेंबर १९८६ मध्ये संत निरंकारी समागमामध्ये करण्यात आले होते, ज्याचे उदघाटन बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी केले होते आणि ही मोहीम मिशनच्या अनुयायांद्वारे मागील ३६ वर्षांपासून निरंतर अशीच चालू असून त्यात आतापर्यंत ७४७३ रक्तदान शिबीर संपन्न झाली असून १२,३२,४९७ युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे. बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि 'रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे'. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.
            संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी ,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता  यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.
            गेल्या १५ दिवसांपासून मिशनचे सेवादार यांनी धायरी परिसरामध्ये नुक्कड नाटिका द्वारे व प्रत्यक्ष भेटून रक्तदानाची जनजागृती करण्यात आली, रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशन चे अनुयायी यांचे योगदान लाभले तसेच आलेल्या सर्व रक्तदात्यांचे, मान्यवरांचे आभार धायरी ब्रांच प्रमुख श्याम भागवत सेवादल संचालक पांडुरंग दळवी यांनी केले.

No comments:

Post a Comment

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी !!

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी !! ** ३१ तास चाललेल्या पालखी सोहळ्यात ग्रामस्थांनी देवीचे शांततेत दर्शन घेत हजारो भाव...