Thursday 28 September 2023

गोवेली ग्रामीण रुग्णालयात पहिल्यांदाच दहा वैद्यकीय तज्ञ उपस्थित राहणार, कल्याण तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्य पर्वणी !

गोवेली ग्रामीण रुग्णालयात पहिल्यांदाच दहा वैद्यकीय तज्ञ उपस्थित राहणार, कल्याण तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्य पर्वणी !

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण ग्रामीण भागासह परिसरातील लोकांसाठी वरदान ठरलेल्या गोवेली ग्रामीण रुग्णालयात विविध आजाराचे सुमारे १० तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार असून कल्याणच्या इतिहासात हे प्रथमच घडत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांसाठी ही आरोग्य पर्वणी ठरणार असून याचा जास्तीतजास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गोवेली ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ माधवी पंदारे मँडम यांनी केले आहे.

केंद्र शासनामार्फत आयुष्यान भव कार्यक्रमाचे उद्घाटन १३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय स्तरावरुन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत चालू राहणार आहे. या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालयात व उपजिल्हा व शासकीय रुग्णालयामध्ये वैद्यकीय महाविद्यालयांच्या सहकार्याने आयुष्यमान मेळावा ३० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत ग्रामीण रुग्णालय गोवेली येथे आयोजित केला आहे.

याकरिता बालरोगतज्ज्ञ, स्त्री रोग तज्ञ, अस्थिभंग चिकित्सक, दंतशल्य चिकित्सक, त्वचा रोग तज्ञ, मनोविकार तज्ञ, कान, नाक, घसा तज्ञ, नेत्रशल्य चिकित्सक आणि सर्जन असे १० विविध आजाराचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी मोतीबिंदू, उच्च रक्तदाब, मधुमेह, तपासणी व मार्गदर्शन तसेच तोंडाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, आदी ची तपासणी करून उपचार केले जाणार आहेत. याशिवाय कुपोषित बालके, गरोदर माता, स्तनदा माता व इतर स्त्रियांची तपासणी केली जाणार आहे. तसेच आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथीकच्या रुग्णांना तपासणी करून उपचारात्मक निदान केले जाणार आहे. यावेळी योग मार्गदर्शन व प्रात्यक्षिके केली जातील, शिवाय सर्जन व्दारे तपासणी करून शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. एवढे विविध आजाराचे तज्ञ वैद्यकीय अधिकारी पहिल्यांदाच ग्रामीण रुग्णालयात येत आहेत. त्यामुळे याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ माधवी पंदारे मँडम यांनी केले आहे.

दरम्यान कल्याण तालुक्यातील गोवेली ग्रामीण रुग्णालय हे ग्रामीण परिसरासाठी वरदान ठरत आहे. या रुग्णालयात मागील १ वर्षात बाह्यरुग्ण सुमारे ३१ हजार ५६५ तर आंतर रुग्ण १ हजार ७४६ इतके उपचारार्थ आले होते. ३२५ लहान मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या असून ८२ प्रसुती, २ हजार ९९५ श्वान दंश, १९७ विंचू, १०८ सर्पदंशचे रुग्णांवर उपचार करण्यात आले. याशिवाय २ हजार ८४३ मलेरिया, ९७ डेंग्यू, ५७० टायफाँइड रुग्णांवर यशस्वी उपचार झाले. तसेच सुसज्ज प्रयोगशाळेच्या माध्यमातून सुमारे १२ हजार ६३५ चाचण्या घेण्यात आल्या.

पुरुष, स्त्री आंतररुग्ण कक्ष, एक्सरे, इसीजी अशा विविध आरोग्य सोईसुविधा या रुग्णालयात मोफत उपलब्ध असल्याने गोरगरीब रूग्णांना मे रुग्णालय मोठा आधार वाटत आहे.अशा या रुग्णालयात ३० सप्टेंबर रोजी आयुष्यामान मेळावा आमदार किसन कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत असून याकरिता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार सुध्दा उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी या आरोग्य पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकिय अधीक्षक डॉ माधवी पंदारे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !!

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !! चोपडा, प्रतिनिधी.. गेल्या दहा वर्षापासून सत्तेत असल...