Thursday 30 November 2023

जिल्हा परिषद ठाणे आणि पंचायत समिती कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने कोलम येथे केंद्रीय राज्यमंत्री (वित्त) यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रा संपन्न !

जिल्हा परिषद ठाणे आणि पंचायत समिती कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने कोलम येथे केंद्रीय राज्यमंत्री (वित्त) यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रा संपन्न !

कल्याण, (संजय कांबळे) : विकसित भारत अभियान अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे आणि पंचायत समिती कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील कोलम येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभागी लाभार्थी बरोबर संवाद साधला  यानंतर केंद्रीय राज्य मंत्री (वित्त) भागवत कराड यांनी उपस्थित लाभार्थी व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.

यावेळी व्यासपीठावर मुरबाडचे आमदार किसन कथोरे, उप जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा जायभाय,  छायादेवी शिसोदिया, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कल्याण प्रांताधिकारी विस्वास गुजर, रामदास दोंड, दिपक कुटे कोलमचे सरपंच राजेश भोईर, ठाणे जिल्हा ग्रामीण भाजपा अध्यक्ष मधुकर मोहपे आदी मान्यवर उपस्थित होते.

दिप प्रज्वलनानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक छायादेवी शिसोदिया यांनी केले, त्या म्हणाल्या विकसित भारत संकल्प यात्रा याची सुरुवात तालुक्यातील जांभूळ ग्रामपंचायत मधून झाली आहे. या यात्रेत ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही, त्यांच्या पर्यंत पोहचणे,विविध शासकीय योजनाचा प्रचार, प्रसार करणे, असा उद्देश असून तालुक्यातील ४६ ग्रामपंचायत मध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये बचत गटांचे उत्पन्न १ लाखापर्यंत नेण्याचा निश्चय असल्याचे त्यांनी सांगितले. 

केंद्रीय राजमंत्री (वित्त) यांनी सांगितले की, हा विकसित रथ देशभर फिरणार आहे, महाराष्ट्रात ४० हजार खेडी, तर देशभर २ लाख ७० हजार खेड्यात पोहचणार आहे. या माध्यमातून देशाला विश्वगुरु बनवायचे आहे. असे त्यांनी सांगितले, यावेळी श्री कराड यांच्या हस्ते कल्याण तालुक्यातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व विविध योजनांचे कार्ड वाटप करण्यात आले.
 
तर आमदार किसन कथोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुळे देश प्रगती करतो आहे, अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे, माझा मतदार संघ हा सागरी, नागरी व डोंगरी आहे, त्यामुळे अनेक रस्ते अद्यापही अपुर्ण आहेत, त्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून निधी मिळाला तर हा प्रश्न मार्गी लागेल, तसेच पंतप्रधान आवास योजनेचा निधी वाढवावा आणि महिलांनाही मानधन द्यावे अशी मागणी त्यांनी मंत्री भागवत कराड यांच्या कडे केली. शिवाय अचानक कल्याण तालुक्यातील कोलम या गावाला हा कार्यक्रम देऊन देखील जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाने चांगले नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कल्याण तहसीलदार जयराज देशमुख, डॉ गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी ठाणे, गटविकास अधिकारी अशोक भवारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ भारत मासाळ बालविकास विभागाच्या अर्चना पवार, बांधकाम चे श्री महाडिक, पाणी पुरवठा चे आशिष कटारे, गोवेली ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ माधवी पंदारे. जीवनदिप विद्यालयाचे रवींद्र घोंडविंदे, विस्तार अधिकारी विक्रम चव्हाण, श्री हरड, कृषी अधिकारी बी बी शिंदे, श्री संत, दिनेश घोलप, अनिस तडवी, सर्व ग्रामसेवक, कर्मचारी, बचत गटाच्या महिला, शालेय विद्यार्थी व लाभार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !!

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !! *संध्या 5 वा.  सिव्हील लाईन जि.प. विश्रामगृह, सिविल लाईन चौ...