Wednesday, 29 November 2023

आयटकची महा संघर्ष यात्रा नववा दिवस...

आयटकची महा संघर्ष यात्रा नववा दिवस...

*देशात शेतकरी कामगाराचे हितसंबंध धोक्यात..कॉ. शाम काळे"

जळगाव, प्रतिनिधी... देशात मोदी सरकारच्या दहा वर्षाचा कारकीर्दीत त्यांची कथनी आणि व्यवहार पाहता.. देशातील कष्टकरी, श्रमिक, शेतकरी, कामगार यांचे हितसंबंध धोक्यात आलेले आहेत. महागाईला ते निवडणूक प्रचारात डायन म्हणत होते, आता ही डायन ..त्यांच्या कारकिर्दीत भरमसाठ पोसली गेली आहे या सरकारने. कामगार वर्गाने लढवून मिळवलेले जुने कामगार कायदे बदलून नवीन कामगार संहिता आणल्या. या देशातील कार्पोरेट घराण्यांना फायदा पोहोचवणार आहेत तसेच देशात 80  टक्के लोकांना मोफत धान्य द्यावे लागते, याचा अर्थ 80 टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली ढकलले गेले आहेत. असा होतो असे प्रतिपादन "महाराष्ट्र आयटकचे सचिव कॉम्रेड श्याम काळे" यांनी केले ते काल रोजी कोल्हापूर ते नागपूर अशा महा संघर्ष यात्रा निमित्ताने जळगाव येथे शिवतीर्थ मैदानावर जिल्हा आयटक तर्फे आयोजित सभेत बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी कॉ. विरेंद्र पाटील होते. 
या जनजागरण सभेत प्रास्ताविक करताना आयटक चे राज्य उपाध्यक्ष कॉ अमृत महाजन यांनी सांगितले की, सदर यात्रा दिनांक 18 डिसेंबर रोजी नागपूर येथे विधानसभेवर महापडाव आंदोलनाने समाप्त होणार आहे त्यात हजारो कामगार महिला सहभागी होणार आहेत जळगाव जिल्ह्यातूनही  1000 अंगणवाडी आयटक आशा ग्रामपंचायत कर्मचारी रोजगार सेवक पर्जन्य मापी सहभागी होणार आहेत. त्यासाठी 17 डिसेंबर 2023 रोजी भुसावळ येथून संध्याकाळी निघतील 
तसेच येत्या 4 डिसेंबर रोजी पासून महाराष्ट्रतील अंगणवाडी कर्मचारी यांच्या संपाचा एल्गार पुकारण्यात आला असून त्यात जळगाव जिल्ह्यातील सात हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत. अशी माहिती दिली

*2024 भाजप हटाव देश बचाओ..कॉ. राजू देसले..*

या सभेचा समारोप करताना भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे राज्य सहसचिव कॉ राजू देसले यांनी सांगितले की, कामगार वर्गाने  मोदी सरकारकडून त्यांच्या हक्कावर होणारे हल्ले महागाई, बेरोजगारीमुळे शेती मोलाला भाव नसल्यामुळे कामगार शेतकरी यांची होणारी परवड पाहता येत्या 2024 साली मोदी सरकारला सत्तेवरून काढून टाकले पाहिजे व इंडिया आघाडीच्या पाठीमागे शक्ती उभी केली पाहिजे.असे आवाहन त्यांनी केले

काल दुपारी 4 वाजता ही संघर्ष यात्रेने औरंगाबाद जिल्ह्याकडे प्रस्थान केले.. . काल महाराष्ट्रभर फिरणाऱ्या संघर्ष यात्रेचा जळगाव जिल्ह्यात नववा दिवस होता. या सभेआधी महाराष्ट्र शाहीर धम्मा खडसे व सदाशिव निकम यांनी क्रांती गीते म्हटली.

या सभेसाठी.. ,किशोर कंडारे शंकर दरी, छगन साळुंखे, पिंटू साळुंखे, रंजना मराठे, लता पाटील, सुलोचना साबळे, मालू नरवाडे, नलिनी भंगाळे, प्रेमलता पाटील, अरुणा पवार, श्रावणजी रल, प्रकाश कंडारे, जयसिंह वाघ, राजेंद्र खरे, सुभाष बाविस्कर, गोकुळ कोळी, कैलास भील, संजना गोडघाटे, मधुकर मोरे, आरिफ मिस्तरी, विजय कोळी, अरुणा सपकाळे आदी सभासद व मान्यवर पदाधिकारी, अंगणवाडी, आशा, ग्रामपंचायत शेतमजूर, पर्जन्यमापक, वीज वर्कर्स फेडरेशन संरक्षण आणि आरोग्य खाते कंत्राटी कर्मचारी यादी संघटना मधून उपस्थित होते.. या संघर्ष यात्रेला चोपडा व जळगाव येथे चांगला प्रतिसाद भेटला.

No comments:

Post a Comment

पंचरत्न मित्र मंडळ चेंबुर तर्फे जागतिक महिला दिन चेंबुर येथे उत्साहात साजरा !

पंचरत्न मित्र मंडळ, चेंबुर तर्फे जागतिक महिला दिन चेंबुर येथे उत्साहात साजरा ! मुंबई, (शांताराम गुडेकर) :         समाजात विविध क...