कोकण वासियांची कल्याण स्थानकातून जास्तीत जास्त रेल्वे गाड्या कोकणात सोडण्याची मागणी !!
कल्याण, प्रतिनिधी : कल्याण हे ऐतिहासिक शहरासोबत एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून येथे आजूबाजूच्या बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा, आसनगाव, शहापूर, मुरबाड, डोंबिवली व कल्याण येथे मोठ्या प्रमाणावर कोकण वासियांची वस्ती असून यांना आपल्या गावी जायचं झाले तर ठाणे किंवा पनवेल या शिवाय दुसरा पर्याय नाही जो अत्यंत अडचणीचा व त्रासदायक आहे.
कल्याण येथील कोकण वासियांनी या संदर्भात रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण सावंतवाडी रजि. या संस्थेच्या अंतर्गत संस्थेचे अध्यक्ष सुनील उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण रेल्वे स्थानक परिसरात कल्याण येथून जास्तीत जास्त रेल्वे गाड्या कोकणात जाण्यासाठी सोडाव्यात यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात आली.
No comments:
Post a Comment