Sunday 28 January 2024

कोकण वासियांची कल्याण स्थानकातून जास्तीत जास्त रेल्वे गाड्या कोकणात सोडण्याची मागणी !!

कोकण वासियांची कल्याण स्थानकातून जास्तीत जास्त रेल्वे गाड्या कोकणात सोडण्याची मागणी !!

कल्याण, प्रतिनिधी : कल्याण हे ऐतिहासिक शहरासोबत एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून येथे आजूबाजूच्या बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा, आसनगाव, शहापूर, मुरबाड, डोंबिवली व कल्याण येथे मोठ्या प्रमाणावर कोकण वासियांची वस्ती असून यांना आपल्या गावी जायचं झाले तर ठाणे किंवा पनवेल या शिवाय दुसरा पर्याय नाही जो अत्यंत अडचणीचा व त्रासदायक आहे.

कल्याण येथील कोकण वासियांनी या संदर्भात रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण सावंतवाडी रजि. या संस्थेच्या अंतर्गत संस्थेचे अध्यक्ष सुनील उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण रेल्वे स्थानक परिसरात कल्याण येथून जास्तीत जास्त रेल्वे गाड्या कोकणात जाण्यासाठी सोडाव्यात यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात आली. 

रविवार दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० ते ०४.०० वाजेपर्यंत राबविण्यात आलेल्या या सह्यांच्या मोहिमेमध्ये कल्याण तसेच आजूबाजूच्या शहरातील नागरिक प्रवाशांनी भरघोस पाठिंबा दिला, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोकण रहिवाशी मंडळ टिटवाळा संस्थापक अध्यक्ष बुवा यशवंत सदाशिव परब, अनिल गायकवाड, शंकर पेंडुरकर, राजेंद्र गावडे, प्रवीण टोले, संतोष मोरे ,विजय सुर्वे, सुधिर गोवळकर महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री.उमेश भारती, पंकज डोईफोडे, मनोज गोस्वामी अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते कार्यक्रम चांगल्या पद्धतीने नियोजन करून  पार पडला अशी माहिती  सुनील उतेकर यांनी दिली होती वेळात वेळ काडून मोहीमेत सामील झालेल्या  सर्वांचे आभार व धन्यवाद मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !!

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !! चोपडा, प्रतिनिधी.. गेल्या दहा वर्षापासून सत्तेत असल...