Wednesday 17 April 2024

२०२४ लोकसभा सभा निवडणुकीत भाजप पराभवाच्या छायेत.. 'भाकप'

२०२४ लोकसभा सभा निवडणुकीत भाजप पराभवाच्या छायेत.. 'भाकप'

.                                           कॉर्मेड अमृत महाजन 

परभणी, प्रतिनिधी.. या लोकसभेच्या निवडणुकीत भाजप छायेत असून नक्की  पराभव होणार ! हे नरेंद्र मोदी यांच्या वृत्त वाहिन्यांवरील चेहऱ्यावरील दिसत असलेल्या  तणाव ग्रस्त चेहऱ्याने स्पष्ट दिसून येत आहे. असे भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या उमेदवार कॉ. राजन क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलताना पक्षाचे माजी खा. अजीज पाशा यांनी सांगितले 

ते पुढे म्हणाले की भाजपाने श्रीधरन यांना पुढे करून  केरळमध्ये पाय जमवण्याचा प्रयत्न केला काही उपयोग झाला नाही म्हणून खोटी केरळ स्टोरी दाखवून लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला. शेवटी माफी मागावी लागली सांगून आखाती देशात वाघाच्या शिकारीत दोषी ठरलेल्या  केरळी मुलाचा दंड 'सात कोटी' दंड भरणेसाठी हिंदू मुस्लिम जनतेने रोज एक कोट रु निधी गोळा करून मुलाची सुटका केली ही खरी केरळी स्टोरी आहे पण गोदी मीडिया हे दाखवटणार नाही असे स्पष्ट केले.  सभेचे प्रमुख वक्ते पक्षाचे सचिव कॉ. डॉ. भालचंद्र कांगो म्हणाले की, डावे पक्ष ७० /७५ जागा लढवीत आहेत. देश पातलीवर पर्याय निर्माण करणेसाठी डाव्यांनी देशभर वातावरण निर्मिती केली. त्यातून इंडिया आघाडी आकारास आली सांगून केरळ मध्ये काँग्रेस विरुद्ध डावे पक्ष असाच मुकाबला होत असला. तरी भाकप  लोकशाही संविधान धर्मनिरपेक्षता साठी धर्मनिरपेक्ष कटिबध्द आहे असे स्पष्ट केले ते पुढे असेही म्हणाले की, गेल्या दहा वर्षातील भारतीय जनता पार्टी आरएसएस मोदी सरकार काळात जगभरातील भारताचे स्थान घसरत आहे. उदाहरणार्थ भूक निर्देशांकात  आपले स्थान अधिकार नेपाळ बांगलादेश पेक्षा खाली पातळीवर आहे. भाषण स्वातंत्र्य तसेच जीडीपी अल्पसंख्यांक यांचे अधिकार याबाबत खालच्या पायरीवर आहे. असे उदाहरणे दिली.

परभणीच्या गजबजलेल्या अपना कॉर्नर जवलील आपला दवाखाना शेजारी झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड सुभाष लांडे होते. त्यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील राजकारण.. खोके, मराठा विरुद्ध ओबीसी हिंदू विरुद्ध अल्पसंख्यांक असे जातीय वादात परिवर्तन करून  राजकारणात विष कालवण्याच्या भाजप आरएसएस चे निती चा भांडाफोड केला .या सभेत कर्नाटक किसान सभेचे नेते मौला मुल्ला व औरंगाबाद येथील तांजीमे इन्साफ संगटनेचे नेते का अश्फाक सलामी यांचेही दणदणीत भाषणे झाली .सभेचे सूत्रसंचालन ऍड माधुरी क्षीरसागर यांनी तर आभार प्रदर्शनाचे भाषणात काँ अब्दुल शेख यांनी केले ते म्हणाले की, गेल्या 2 वर्षापासून नगरपालिका जिल्हा परिषद निवडणूका तहकुब झाले आहेत अशा तऱ्हेने 2024 नंतर पुढील लोकसभा विधानसभा निवडणुका तहकुब होतील असा इशारा त्यांनी दिला व कॉ. राजन क्षीरसागर यांना निवडून देण्याचे आवाहन केले.सभेला चांगला जनसमुदाय जमला होता........

.का अमृत महाजन 9860520560

No comments:

Post a Comment

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !!

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !! चोपडा, प्रतिनिधी.. गेल्या दहा वर्षापासून सत्तेत असल...