Friday 26 July 2024

देशाच्या संरक्षण विभागात सहभागी होणे हीच खऱ्या अर्थाने वीरांना सलामी- डॉ. नंदकुमार झांबरे

देशाच्या संरक्षण विभागात सहभागी होणे हीच खऱ्या अर्थाने वीरांना सलामी- डॉ. नंदकुमार झांबरे 

विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

विरार येथील विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात २६ जुलैच्या कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून कारगिल युद्धात वीरमरण आलेल्या शूर जवानांच्या शौर्य, पराक्रम आणि यशाची गाथा सांगणारा 'वीरांना सलामी' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. 

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नंदकुमार झांबरे, विभागप्रमुख, राष्ट्रीय छात्र सेना व सहाय्यक प्राध्यापक, संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय वसई हे उपस्थित होते. या कार्यक्रमात शहीद जवान आणि वीरांसाठी कला विभागातील विद्यार्थ्यांनी व शिक्षक प्रा. योगेश राजपूत यांनी देशभक्तीपर गीताचे गायन केले. मुलांना आणि मुलींना सुरक्षा व्यवस्थेत असणाऱ्या विविध संधीबद्दल प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. आपल्या देशाच्या सार्वभौमत्वासाठी आणि राष्ट्रीय एकात्मता टिकून ठेवण्यासाठी प्रत्येक तरुणांनी संरक्षण दलामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करावा आणि खऱ्या अर्थाने देशाची सेवा करावी असा मोलाचा संदेश डॉ. नंदकुमार झांबरे यांनी दिला. 

विद्यार्थ्यांनी लष्करासारखी शिस्त आणि वर्तणूक ठेवली तर आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते असे प्राचार्या श्रीमती. मुग्धा लेले यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य सुभाष शिंदे, कला विभाग प्रमुख प्रा. विनोद जंगले, कनिष्ठ महाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि अशा विविध कार्यक्रमांचे आयोजनासाठी संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी नेहमीच पाठीशी उभे राहून सहकार्य करतात त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी असे कार्यक्रम आम्ही आयोजित करू शकतो असे मत प्राचार्या आणि उपप्राचार्यानी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कुसुम नाईक यांनी तर सूत्रसंचालन डॉ. महादेव इरकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. पूनम चौधरी यांनी केले. कला विभागातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment