राज्य शासनाच्या 'उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४' साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ !!
मुंबई, दि. ९, प्रतिनिधी : माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक १ जानेवारी. २०२४ ते ३१ डिसेंबर, २०२४ पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. पुरस्कारासाठी प्रवेशिका मागविण्याकरिता दि. १९ जुलै, २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील विविध भागातील स्पर्धकांनी पालघर जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा मुख्यालय, प्रशासकीय इमारत - ब, तळमजला, कक्ष क्र. 008कोळगांव, पालघर - बोईसर रोड ता. जि. पालघर, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने http://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
वृत्तांत - जयेश शेलार
जेष्ठ पत्रकार, संपादक/ वाडा तालुका अध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस)
No comments:
Post a Comment