घनकचरा विभागाने आधी कचरा शुन्य कल्याण, शुन्य कचरा तक्रार करावी आणि नंतर विविध कचरा संकलन मोहीम राबवावी !!
(नागरीकांना सक्ती आधी नियमित कचरा उचलून यंत्रणा सक्षम करावी स्फूर्ती फाउंडेशनची मागणी)
कल्याण, प्रतिनिधी - केडीएमसी घनकचरा विभागाच्या वतीने नुकतेच एक आदेश काढण्यात आलेला असून ज्यामध्ये आठवड्यातील वारां प्रमाणे विविध कचऱ्यांचे संकलन नागरिकांकडून घेण्यात येणार आहे सदर संकल्पना ही दैनंदिनी जिवनात नागरीकांना शक्य आहे का ? सदर संकलप्नेसाठी अनेक कचरा डब्यांची आवश्यकता लागेल ते उपलब्ध कसे होणार? त्याचबरोबर तक्त्यात उल्लेख करण्यात आलेला कचरा दररोज जमेलच असे नाही, आधीच कचरा उचलण्यासाठी आवश्यक संक्षम य़ंत्रणा नाही व नवीन संकल्पनेमुळे अधिक ताण पडणार त्याचे काय नियोजन ? त्यामुळे मुळे सदर संकल्पनेचे वास्तव्य जाणून घ्यावे व नागरीकांवर कचरा संकलन करण्याची सक्ती करु नये याआधी कचरा पासून कंपोस्ट खताची संकल्पनेच काय झालं याच उत्तर द्यावे, घनकचरासाठी अधिक कर घेण्यात आला त्याची नागरीकांना काय अतिरिक्त सुविधा दिली याचे उत्तर द्यावे. अशा संकल्पना राबविण्याआधी परिसरामध्ये रस्त्यावर अनेक कचऱ्याचे ढीग दिवसेंदिवस पडलेले असतात ते नियमित उचलावे व रस्त्यावरील कचर्याचे वर्गीकरण कसे करणार याची माहिती जनतेला द्यावी, कचरा उचलण्यासाठी आवश्यक गाड्यांची संख्या वाढवावी, गाड्या नादूरूस्त असल्याने अनेक वेळा ४-५ दिवस गाड्या कचरा उचलण्यासाठी येत नाही कामगारांचा पगार, बोनस साठी संघर्ष नेहमीच पहायला मिळतो, कधी गाड्यांची समस्या कधी कामगारांची समस्या त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी असतात की गाडी कचरा उचलण्यासाठी येत नाहीये.
याबाबत अधिकारी व कर्मचारी यांना फोन करून गाडी बोलण्यासाठी विनवणी करावी लागते त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सदर आधी आपली यंत्रणा मजबूत व सक्षम करावा, कचरा शुन्य कल्याण आधी करावे, शुन्य तक्रार झाल्यानंतरच अशा संकल्पना राबवाव्यात असे निवेदन स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर कल्याण डोंबिवली महानगरपालिका घनकचरा विभागाला दिले
अगदी बरोबर आहे।
ReplyDeleteKDMC ने सर्वात अगोदर कचरा नियमित उचलण्या साठी उत्कृष्ट आणि पर्याप्त गाड्या व कामगार ठेवावे