Saturday 27 June 2020

अंबरनाथ पुन्हा लॉकडाऊन असताना कडक नियमांचा अभाव !!

अंबरनाथ पुन्हा लॉकडाऊन असताना कडक नियमांचा अभाव !!


अंबरनाथ शहरात कोरोनाग्रस्त रुग्ण संख्या झपाट्याने वाढतच आहे. यावर नियंत्रण मिळवण्याची गरज असल्याने प्रशासनने पुन्हा लॉकडाऊन केले खरे पण ते करताना कोणतेही  नियम अटी व नियोजन दिसून आले नाही. पोलिस प्रशासन आणि आरोग्य कर्मचारी वगळता अत्यावश्यक व जीवनाश्यक दुकाने सूरू असावीत असे होते. परंतु औद्योगिक क्षेत्रात सगळे काही सूरू होते. दारूचे दुकाने, कंपन्या आणि त्यांना घेऊन जाणाऱ्या बसेस बिनधास्त चालत होते. याचाच अर्थ या सगळ्यांनी नियमाचे उल्लंघन केले आहे. यावर काय कार्यवाही करणार ? 
पण ही वेळच आशी आहे की प्रत्येकानं संयम आणि खबरदारी ने वागायला हवं, मीच एकटा बरोबर आणि बाकी सगळे चोर ही वृत्ती नको या भयंकर परिस्थितीत.  
प्रशासनात काम करणारी माणसं घरदार सोडून दिवस रात्र लढत आहेत, (तेही काही उपकार करत नाहीत, कामाचा भाग आहे. पण कोणत्या परिस्थितीत आणि किती वेळ काम करत आहेत याचं कुणाला सोयरसुतक नाही) आणि सर्वात जास्त रिस्क जे विभागात  काम करत आहेत, उद्या यांच्यापैकी कोणी पोसिटीव्ह आला तर आख्खी यंत्रणा बिनकामाची होऊन जाईल. 
अपुरी संसाधनं, अपुरं मनुष्यबळ, हातात शस्त्रचं नाही आणि शत्रू दिवसेंदिवस आपला आकार वाढवत आहे, अशी ही लढाई आहे. ही लढाईच वेगळी आहे, इथं शरीराने दूर राहून पण विचाराने आणि मनाने एकत्र येऊन लढलो तरच निभाव लागणार आहे आपला. एकमेकांवर विश्वास ठेवून, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरून, सामाजिक अंतर पाळून, स्वच्छतेच्या सवयी बाळगून, एकमेकांना सहकार्य करूनच ही लढाई लढावी लागेल. 
"वाढणारी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या रोखण्याची  वेळ आली  आहे.   कडक नियमाचे पालन करा. मास्क वापरा , सॅनिटाइजर नेहमी सोबत ठेवा. सामाजिक अंतर ठेवा.  गरज असेल तरच घरा बाहेर पडा"

"अरूण ठोंबरे'
'पत्रकार /संपादक'
*9322107521*

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...