Monday 29 March 2021

कोरोनाचे नियम पायळी तुडवणा-या हुलड्डबाज तरुणांची पोलिसांकडून, धुळवड ?

कोरोनाचे नियम पायळी तुडवणा-या हुलड्डबाज तरुणांची पोलिसांकडून, धुळवड ?


कल्याण, (संजय कांबळे) : कोरोनाच्या वाढत्या धोक्याने संपुर्ण प्रशासन चिंतेत असताना कोरोनाचे कोणतेही नियम न पाळणा-या हुलड्डबाज तरुणांची रायते गावातील आदर्श मित्र मंडळाच्या मदतीने पोलीसांनी पळवून पळवून धुळ+वड साजरी केली.


सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे,राज्यातील अनेक जिल्हे हाँटस्पाँट घोषित होऊन लाँकडाऊन लागले आहे, मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे ही शहरे धोकादायक बनू पाहत आहेत. कोरोनाचा वाढता धोका पाहून शासनाने होळी व धुळवड घरीच साजरी करा असे अवाहन करण्यात आला होता, एकट्या कल्याण डोंबिवली शहराचा विचार केला तर येथे दररोज हजारो पेशट आढळून येत आहेत. तर कल्याण ग्रामीण भागात देखील पेंशट वाढत आहेत, खोणी, म्हारळ, म्हसकळ, वरप, बापसई, जांभूळ, खडवली या ग्रामपंचायत हद्दीत रुग्ण सापडत आहेत, सध्या तालुक्यात २ लाख ५५० हजार,५५९ इतके पेंशट असून ११७८ ऐवढे अँक्टीव केसेस आहेत, तर १४१ लोकांनी जीव गमावला आहे.त्यामुळे कोरोनाचे नियम पाळण्याचे अवाहन केले, तसेच होळी व धुळवड साधेपणाने साजरी करण्यास सांगितले, परतू आज रायते येथील उल्हास नदीवर उल्हासनगर व परिसरातील हुलड्डबाज तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. येथे कोणाकडेही मास्क,सोशलडिस्टिग चे पालन केले जात नव्हते, अखेर रायते गावातील,सुदाम भोईर, रसीद शेख, आदींनी गोवेली पोलिस चौकीला कळवले, पोलिस घटनास्थळी दाखल होताच तरुणांची पळापळ झाली, वाट दिसेल तिकडे हे पळत होते. प्रशासन इतके जिव तोडून सांगत आहे, पोलीस उन्हातान्हात कामगिरी बजावत आहेत, आणि हे हुल्लडबाज कोरोनाचे नियम पायदळी तुडवत आहेत, अशांना शासन व्हायलाच हवे, अन्यथा ग्रामीण भागात देखील कोरोनाचा विस्पोट व्हायला वेळ लागणार नाही.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...