Wednesday 24 March 2021

शेतकर्यांची व सर्व सामान्य ग्राहकांची वीज तोडणी तात्काळ थांबवा अन्यथा राज्यभर उग्र आंदोलन करण्यात येईल !!

शेतकर्यांची व सर्व सामान्य ग्राहकांची  वीज तोडणी तात्काळ थांबवा अन्यथा राज्यभर उग्र आंदोलन करण्यात येईल !!


"महावितरणला संभाजी ब्रिगेड चा इशारा". 

       बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : संभाजी ब्रिगेड रायगड जिल्हा च्या वतीने महावितरण कार्यालयाचे अभियंता यांना शेतकर्‍यांची वीज कनेक्शन तोडण्यात येऊ नये अश्या प्रकाराचे निवेदन संभाजी ब्रिगेड रायगड जिल्हाच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवश्री भूषण राजाराम सिसोदे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. 
      सध्या सर्वत्र करोना संसर्गाचा काळ चालू आहे या काळामध्ये शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळाला नाही, जे पिकलं ते विकता आलेला नाही, त्यामुळे शेतकरी खूप अडचणीत सापडलेला आहे, मागील कित्येक वर्षे पाऊस नव्हता आणि पाणीही नव्हतं परंतु यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे थोडेफार पीक आले नाही. आणि आपण त्यांची लाईन कट करत आहात, सध्यास्थितीत २० ते २५ टक्के शेतकरी बांधव यांचे ओलित पीक आहेत.                   निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हा प्रचंड ग्रासलेला आहे, त्यामध्ये करोणा रोगाचा संकट, पीक काढणीला आले की लॉकडाऊन लागते, हमीभाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल झाले असून शेतकरी सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करीत आहेत. शेतकऱ्यांची लाईट कट करु नये आणि तोडलेली लाईट परत सुरळीत चालू करून द्यावी, नाहीतर संभाजी ब्रिगेड तर्फे एकाचवेळी राज्यभर धरणे आंदोलन, टाळा ठोको आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची गंभीरतेने दखल घ्यावी. असा इशारा संभाजी ब्रिगेड रायगड जिल्याच्या  वतीने देण्यात आला आहे.
      लयावेळी संभाजी ब्रिगेड रायगड  जिल्हाध्यक्ष शिवश्री भूषण राजाराम शिसोदे, शिवश्री पृथ्वीराज भास्करराव खाडे रायगड जिल्हा सचिव  शिवश्री  अश्रफ पठाण  रायगड जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री विनोद सुतार तालुका कार्याध्यक्ष शिवश्री सुरज भिंगारे शहराध्यक्ष शिवश्री सुयोग गायकवाड  शिवश्री अजित सुतार तालुकाध्यक्ष ईत्यादी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...