Thursday, 25 March 2021

कांबा पावशेपाडा येथे दरोडा टाकणा-याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, पोलीसांवर अभिनंदनाचा वर्षाव !!

कांबा पावशेपाडा येथे दरोडा टाकणा-याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, पोलीसांवर अभिनंदनाचा वर्षाव !!


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण ग्रामीण भागात कांबा पावशेपाडा,पाचवामैल,पांजरापोळ,आणि रायते आदी परिसरात तलवार,चाँपर,आदी जिवघेणी शस्त्रे दाखवून लुटालूट, मारहाण करणा-या शस्त्र टोळीतील तिंघांना कल्याण तालुका पोलीस आणि ठाणे ग्रामीण क्राईम ब्रँच पोलिसांनी अहमदनगर जिल्हातील पारनेर येथून मुसक्या आवळल्या असून यांना कार्टात हजर केले असता न्यायालयाने ३०तारखेपर्यत पोलिस कस्टडी सुनावली आहे, पोलिसांच्या या कामगिरी बद्दल कल्याण तालुक्या कतून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,
तीनच दिवसापूर्वी कल्याण तालुक्यातील पावशेपाडा गावात ८/१०जणांच्या शसत्र टोळीने धाडसी दरोडा घातला होता.यामध्ये सोने, पैसा लुटला होता यांनतर पाचवामैल, पांजरापोल आणि रायते येथील जो भेटेल त्याला मारहाण करुन लुटत होते, हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता, हे चोर अगदी बिनधास्त गावात लुटालूट करीत असल्याचे दिसत होते, हा विडिओ व्हायरल झाल्याने तसेच तालुक्यातील पत्रकार रविद्र घोंडविदे, संजय कांबळे, सिध्दार्थ गायकवाड आदीनी पोलिसावर व त्यांच्या कर्तव्यावर जोरदार टिका केली होती, परंतू जराही विचलित न होता, संयम ढळू न देता नवनियुक्त वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजू वंजारी यांनी पोलीस अधीक्षक, विक्रम देशमाने, डिवाय एसपी शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे ग्रामीण क्राईम ब्रँच व कल्याण तालुका पोलीस ठाणे यांनी विविध पथके तयार करुन सीसीटिव्हीच्या आधारे व मिळालेल्या माहितीवरुन अहमदनगर येथील पारनेर मधून मोठ्या शिताफिने किरन जांभळकर, अनिल पवार आणि अक्षय गायकवाड यांच्या मुसक्या आवळल्या हे सर्व फोर व्हिलरने येथे आले होते अजूनही ८/१०जण असल्याचे पोलिसांनी सांगितले, या तिंघांना कल्याण कोर्टात हजर केले असता त्यांना ३० मार्च पर्यत पोलिस कोठडी सुनावली असून इतरांनाही लवकरच पकडू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

*वाढदिवसांची भेट- आजच ठाणे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांचा वाढदिवस आहे,आणि आजच इतका आव्हानात्मक गुन्हा ठाणे ग्रामीण क्राइम ब्रँच व कल्याण तालुका पोलिसांनी उघडकीस आणला असल्याने एसपी साहेबांना ही वाढदिवसांचीभेट असल्याचे कल्याण तालुका पोलिस ठाण्याचे वपोनी राजू वंजारी यांनी सांगितले .या अलोकिक कामगिरीमुळे कल्याण तालुक्यात आंनदांचे वातावरण पसरले असून पोलिसांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे तालुक्यातून अभिंनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

हवामान बदल व त्याचे परिणाम या विषयावर युसुफ मेहेरअली सेंटर तारा येथे कार्यशाळा संपन्न !!

हवामान बदल व त्याचे परिणाम या विषयावर युसुफ मेहेरअली सेंटर तारा येथे कार्यशाळा संपन्न !! हवामान बदल व त्याचे परिणाम  या विषयावर ...