राज्यातील कोरोनाबाधित होत आहे घट ! पण मृत्यूदर विचार करायला लावणारा !!
मुंबई : महाराष्ट्रातील संपूर्ण एप्रिल महिना वेगाने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या मे महिन्याच्या शेवटाकडे आता ओसरु लागली आहे. नव्याने सापडणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने ३० हजारांच्या खालीच राहत असून ती आता वीस हजारांच्या घरात पोहोचली आहे.
राज्यात शुक्रवारी दिवसभरात एकूण २० हजार ७४० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाल्यामुळे राज्यातील आत्तापर्यंत सापडलेल्या एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५६ लाख ९२ हजार ९२० एवढा झाला आहे. पण, सध्या राज्यात त्यातील फक्त २ लाख ८९ हजार ०८८ अॅक्टिव्ह रुग्ण कोरोनाचे उपचार घेत आहेत. तर ५३ लाख ०७ हजार ८७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
शुक्रवारी दिवसभरात ३१ हजार ६७१ रुग्ण बरे झाले असून राज्याचा रिकव्हरी रेट कालपेक्षा किंचित वाढून ९३.२४ टक्के एवढा झाला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मृतांचा आकडा ५०० च्या खाली उतरला आहे. राज्यात आज दिवसभरात ४२४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर १.६४ टक्के एवढा झाला आहे.
No comments:
Post a Comment