Friday 28 May 2021

भिवंडीत वळ गावात लागलेल्या आगीत एक मजली कौलारू घर जाळून खाक.!

भिवंडीत वळ गावात लागलेल्या आगीत एक मजली कौलारू घर जाळून खाक.!


अरुण पाटील, भिवंडी :
            भिवंडी तालुक्यातील गोडाऊन पट्ट्यात आगीच्या विविध घटना घडत असतानाच वळ ग्रामपंचायत हद्दीतील एका एक मजली कौलारू घरास आग लागून संपुर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. या आगीत घरातील लाखो रुपयांचे साहित्याचे नुकसान झाले आहे . 
         वळ गावातील श्याम भोईर ,जनार्दन भोईर, निराबाई भोईर व कैलास भोईर या भोईर कुटुंबाचे  सामायिक एक मजली कौलारू घर होते. शुक्रवारी (दिं.28) रोजी  सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास वरच्या मजला वर शॉर्ट सर्किट ने अचानक आग लागली, या आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारन करून ही आग संपूर्ण घरात पसरली. कैलास भोईर यांच्या दोन मुलांचे नुकताच लग्न झाले असून त्या लग्नात मिळालेले मानपान व आहेराच्या साहित्यसह  ठेवलेले ए.सी. यंत्राने पेट घेतला.त्यात कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन संपूर्ण सिलिंग व कौलारू छत कोसळले.
              आगीची माहिती मीळताच स्थानिकानीं आग विझवाण्याचा प्रयत्न करून नतर नारपोली पोलिसांसह अग्निशामक दलास पाचारण केले. त्यानंतर तब्बल एक तासाने अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी वळ गावचे सरपंच राम भोईर ,पोलीस पाटील गिरीधर पाटील यांसह अनेक ग्रामस्थ युवक यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो पर्यंत संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. या घटनेची नोंद नारपोली पोलिसांनी घेतली असून घटना स्थळी तलाठी सजा -पूर्णा चे  श्री. सुधाकर कामडी यांनी आगीतील नुकसानीचा पंचनामा केला आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...