Wednesday, 26 May 2021

राज्यात रुग्णसंख्या आटोक्यात; बरेच दिवसांनंतर बाधितांचा आकडा जास्त !

राज्यात रुग्णसंख्या आटोक्यात; बरेच दिवसांनंतर बाधितांचा आकडा जास्त !


मुंबई: राज्यात 24,752 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 23,065 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 453 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या बऱ्याच दिवसानंतर कमी आली आहे. राज्यात एकूण 3,15,042 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आजपर्यंत एकूण 52,41,833 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.76% टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 453 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.62 टक्के एवढा आहे.

No comments:

Post a Comment

रिपोर्ट: सपोनि विनोद पाटील नेम. म.फुले चौक पोलीस स्टेशन कल्याण प. यांच्याकडुन विषय म.फुले चौक पो.स्टे. कल्याण येचील बेवारस वाहनांची माहीती व...