Tuesday 30 November 2021

कल्याण तालुक्यातील अनेक शिक्षकांचे लसीकरण नाही, इतर सोईसुविधांची वाणवा, ओमिक्रोनला रोखणार कसे ?

कल्याण तालुक्यातील अनेक शिक्षकांचे लसीकरण नाही, इतर सोईसुविधांची वाणवा, ओमिक्रोनला रोखणार कसे ?


कल्याण, (संजय कांबळे) : राज्यातील सर्व शाळा उद्या म्हणजे १ डिसेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. याला आरोग्य विभागाने ग्रीन सिग्नल देतांना नव्या व्हेरिएंट विरोधात लढण्यासाठी काही उपाय व काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु जिल्ह्यासह कल्याण तालुक्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे दोन्ही डोस पुर्ण झाले नाहीत, शिवाय इतर जी काळजी घेण्या सांगितले आहे. त्याच्या मध्ये अनेक अडचणी येत असल्याने जगावर घोंगावणारे 'ओमिक्रोन'चे संकट कसे रोखणार? मुलांना शाळेत पाठवायचे की नाही? असे प्रश्न पालकापुढे पडले आहेत.


आधीच कोरोनाच्या महामारी संकटामुळे गेल्या एक दिड वर्षांपासून शाळा बंद आहेत, विद्यार्थी, पालक व शिक्षक वैतागून गेले आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी व्हँक्शीनेशन अंत्यत महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने शासन प्रयत्न ही करत आहे, १८ पासून पुढे वेगवेगळ्या वयोगटाचे लसीकरण सुरू आहे. मात्र लहान मुलांचे अद्यापही लसीकरण सुरू नाही. अशातच तिसऱ्या लाटेचा या मुलांना अधिक फटका बसेल अशी शंका व्यक्त केली जात होती. सुदैवाने तसे झाले नाही.


परंतु आता शासनाने इयत्ता १ ली ते पुढचे वर्ग / शाळा करण्याचा निर्णय घेतला. आणि अशातच दक्षिण आफ्रिकेतून'ओमिक्रोन' हा नवा कोरोनाचा व्हेरिएंट आल्याचे वृत्त सर्वत्र पसरले, हा अधिक घातक असून यावर दोन्ही डोस देखील प्रभावी ठरत नाही असे समोर आल्याने जगाची चिंता वाढली. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून सुमारे १ हजार लोक मुंबई आल्याचे, त्यातील काही ठाणे, डोंबिवली आल्याचं कळल्यावर अधिक टेन्शन वाढले, हे कमी की काय म्हणून खडवली येथील आश्रमात जवळपास ६९ लोक ही कोरोना पाँझिटिव्ह आल्याने चिंता अधिकच वाढली,


आणि अशा परिस्थितीत शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय घेताना, मुलांना एका बेंचवर एकच, दोघामधील अंतर ६ फुट, शिक्षकांचे दोन्ही डोस पुर्ण असावेत, शाळेची शौचालय दिवसातून ५ वेळा, सँनिटायझर करावी, हात धुण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी ,अशा सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु ठाणे जिल्ह्याची परिस्थिती पाहता मोठी अवघड स्थिती निर्माण झाली आहे.


कल्याण तालुक्यात १२० च्या आसपास जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, यामध्ये ३५२ शिक्षक आहेत, यातील केवळ ३०६, शिक्षकांचे दोन्ही डोस पुर्ण झाले आहेत, ३८ शिक्षकांनी एकच डोस घेतलेला आहे, तर ८ शिक्षकांनी एकही डोस घेतलेला नाही, इतर सोईसुविधांचा विचार केला तर अनेक शाळामध्ये पाणी नाही, शौचालय नादुरुस्त झाली आहेत, सर्व शिक्षा अभियानातून खोदलेल्या १०/१२ बोअरवेल नादुरुस्त/बंद आहेत असे पाणी पुरवठा कर्मचारी यांचे म्हणणे आहे, तालुक्यातील सर्व शिक्षा अभियानाचे केंद्रच विविध प्रकारच्या सोईसुविधांच्या मुळे 'बेवारस' झाले आहे. त्यांची पाटी सध्या तरी कोरीच आहे, शिवाय अनेक गावात पाणी प्यायला मिळत नाही तर शाळेचे काय?गावातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था तर फारच बिकट झाली आहे. काही ठिकाणी नळ आहे, पाणी नाही, शौचालय आहे, दारे खिडक्या नाहीत, मैदान आहे, स्वच्छता नाही, गेल्या दिड वर्षांपासून शाळेकडे ढुंकूनही न पाहिल्याने शाळांची वाईट अवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या विविध नियमांची कशी अमंलबजावणी होणार?

हे फक्त कल्याण तालुक्यात आहे असे मुळीच नाही शेजारच्या, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर व भिवंडी तालुक्यात फारशी वेगळी स्थिती नाही, मुरबाड तालुक्यातील एकूण ४०५ शाळा आहेत, यामध्ये जिपच्या ३२९ शाळा व ८१५ शिक्षक आहेत, यांचेही शंभर टक्के लसीकरण झाले नाही, ९ शिक्षकांनी एकही डोस घेतला नाही. त्यामुळे जगावर येवू घातलेले "ओमिक्रोन"चे संकट कसे रोखणार? शासनाचा शाळाु सुरू करण्याचा निर्णय कोणाच्या माथ्यावर व कोणाच्या पथ्यावर पडेल, हे येणारा काळच ठरवेल! पण पालक म्हणून आपण आपल्या पाल्यांची काळजी घेऊन, शासनाच्या नियमांचे/ सूचनांचे पालन करून कोरोना प्रमाणे यालाही गाडायला हवे.

प्रतिक्रिया :

तालुक्यातील सर्व शिक्षकांना सूचना दिलेल्या आहेत, विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे- सुनीता मोटघरे, (गटशिक्षणाधिकारी, कल्याण पं.स.)

*जिल्ह्यातील झेडपी शाळांची खूपच वाईट परिस्थिती आहे, अनेक शाळांमध्ये शौचालय, पाणी, आदी सुविधा नाहीत- ॲड. मनोज सुरोशे, कल्याण.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...