Friday 26 November 2021

कल्याण तालुक्यात सविधानांचा जागर उत्साहात, जीवनदिप महाविद्यालयात न्यायाधीशांनी केले वाचन !!

कल्याण तालुक्यात सविधानांचा जागर उत्साहात, जीवनदिप महाविद्यालयात न्यायाधीशांनी केले वाचन !!


कल्याण, (संजय कांबळे) : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या 'भारतीय संविधान' २६ नोव्हेंबर या दिनाचे निमित्ताने संपूर्ण कल्याण तालुक्यात संविधानाचा जागर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तर तालुक्यातील गोवेली येथील जीवनदिप महाविद्यालयात न्यायाधीशांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. तसेच सर्व ग्रामपंचायत व शासकीय, निमशासकीय कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला.


भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनी टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवला, मसूदा समितीचे अध्यक्ष म्हणून अगदी चोख जबाबदारी पार पाडली, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राज्याची घटना त्यांनी लिहून ती आजच्या दिवशी म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली. त्यामुळे ते घटनेचे शिल्पकार ठरले, तोच हा दिवस देशभर 'संविधानदिन' म्हणून साजरा केला जातो.


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत असताना, देशात सविधानांचा जागर देखील साजरा होत आहे, या निमित्ताने आज तालुक्यातील गोवेली येथील जीवनदिप महाविद्यालयात उल्हासनगर न्यायालयाचे न्यायाधीश पंडित सर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन संविधानाचे वाचन करून विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली, यावेळी सविधानांमुळे आपण ग्रामीण भागात राहून ही न्यायाधीश झालो, ही डॉ बाबासाहेबांची देण आहे, असे सांगून सर्वांनी कायद्याचे पालन करावे असे अवाहन त्यांनी यावेळी केले. 


तर कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू आंधळे म्हणाले, आपले खरे हिरो हे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आहेत, सविधानांने आपले अधिकारी व कर्तव्य सुरक्षित केली आहे. आपण आपले अधिकार वापरतो, पण नेमकी कर्तव्य विसरतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला हवे. असे बोलून सर्वांनी कायदा सुव्यवस्था राखायलाच हवी असे सांगितले. तर जीवनदिप महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र घोंडविदे यांनी सांगितले की, या देशावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे उपकार आहेत, सविधानांमध्ये प्रत्येक घटकांचा बारकाईने विचार केला आहे, त्यामुळे सगळे सुरक्षित असून आपली लोकशाही ही जगात मोठी आहे, याचा आपल्याला अभिमान असायला हवा, असे सांगून आज महाविद्यालयात ख-या अर्थाने सविधानांचा जागर सुरू आहे, तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी गावोगावी जावून लोकांना सविधानांच महत्त्व पटवून सांगत आहेत. असे त्यांनी सांगितले. 


यावेळी व्यासपीठावर प्राचार्य, कोरे सर व इतर प्राध्यापक वर्ग तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने महाविद्यालयाच्या लाँयब्रिमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध प्रकारच्या पुस्तकाचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.

याचप्रमाणे तालुक्यातील विविध ग्रामपंचायती, चौक, मंडळे, विविध सामाजिक संघटना, यांनी सविधानांचा जागर मोठ्या उत्साहाने साजरा केला.

No comments:

Post a Comment

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती प्रभारी सचिव कानिक पाटील सेवानिवृत्त !!

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती प्रभारी सचिव कानिक पाटील सेवानिवृत्त !! कल्याण, (एस. एल. गुडेकर) :             कल्याण कृषी उत्पन...