Sunday 28 November 2021

शेरे गावातील व्दारकाबाई पंडित या वयोवृद्ध आजीच्या घराला व शौचालयाला समृद्धीच्या ब्लास्टिंगचा जबर फटका !!

शेरे गावातील व्दारकाबाई पंडित या वयोवृद्ध आजीच्या घराला व शौचालयाला समृद्धीच्या ब्लास्टिंगचा जबर फटका !!


कल्याण, (संजय कांबळे) : शहापूर तालुक्यातील शेरे (बौध्दवाडा) येथील वयोवृद्ध आजी व्दारकाबाई मंगल पंडित हिच्या घर व शौचालयास मुंबई नागपूर या समृद्धी महामार्गासाठी केल्या जाणाऱ्या ब्लास्टिंगचा जबर फटका बसला असून राहत्या घरास तसेच शौचालयास पुर्णपणे तडा गेला आहे, ते कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे म्हातारपणी या आजीला 'बेघर, होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मुंबई नागपूर हा महत्त्वकांक्षी महामार्ग सुरू झाला. १० जिल्हे, ३० तालुके आणि ३५४ गावातून हा महामार्ग जात असून ७१० किलोमीटर लांब व १२० मीटर रुंद अशा या महामार्गात शेकडो गावे बाधित झाली आहेत. शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी यामध्ये बाधित होत आहेत. यातील काही ना नुकसानभरपाई मिळाली आहे तर अद्यापही काही प्रतिक्षेत आहेत. कल्याण तालुक्यातील शेतकरी नेते चंद्रकांत भोईर यांनी या विरोधात मोठे अंदोलन उभे केले होते, आता असेच अंदोलन शहापूर तालुक्यात होते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


हा महामार्ग शहापूर तालुक्यातूनही जात आहे, सध्या याचे काम शेरे गावानजीक सुरू आहे, गावाच्या बाजूला मोठमोठे डोंगर असल्याने व हा मार्ग याच्यातून जात असल्याने ते ब्लास्टिंगच्या सहाय्याने फोडले जात आहे, परंतु या ब्लास्टिंगमुळे शेरे गावातील आदीवासी वाडी व बौध्दवाडा येथील लोकांच्या घरांना जबरदस्त हादरे बसत आहेत, बौध्दवाडी तील व्दारकाबाई मंगल पंडित वय ७० वर्षे या वयोवृद्ध आजच्या घराला तसेच शौचालयाला मोठमोठे तडे गेले आहेत, शौचालय तर जमीनीतून उखडलेले आहे, या आजीच्या लहान ३ नाती एक सून असून मुलगा मोलमजुरी करुन कसेबसे पोट भरत आहेत, व्दारकाबाई पंडित या दारिद्र्य रेषेखालील असून त्यांना घरकुल योजनेतून घर व शौचालय बांधून मिळाले आहे. ब्लास्टिंगचा दणका इतका मोठा आहे की शौचालय कधीही कोसळू शकते, या भितीमुळे हे कुंटूब शौचालयात जायला घाबरत आहे.


अशीच परिस्थिती आदिवासी वाडी व बौद्धवाड्यातील इतर लोकांच्या घराची व शौचालयाची झाली आहे, येथील बाधित ग्रामस्थांनी शहापूर तहसीलदार यांच्या कडे लेखी तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात वयोवृद्ध आजी व्दारकाबाई पंडित यांना विचारले असता त्या म्हणाल्या, आधीच माझी शेतजमीन या महामार्गात जात आहे, त्याची अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही, तोच आता घर व शौचालय कोसळण्याची भिती वाटत आहे. असे झाले तर माझ्यासह माझा मुलगा, सुन व नातवंडे बेघर होणार आहे, त्यामुळे वेळीच नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली तर महामार्गाचे काम पुर्ण झाल्यावर सर्वांनी नुकसान भरपाई मिळेल असे समृद्धी महामार्गाच्या अधिका-यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती प्रभारी सचिव कानिक पाटील सेवानिवृत्त !!

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती प्रभारी सचिव कानिक पाटील सेवानिवृत्त !! कल्याण, (एस. एल. गुडेकर) :             कल्याण कृषी उत्पन...