Friday, 10 December 2021

कल्याण आरटीओ कार्यालयातील बंडोबा बनले थंडोबा, एजंटाने केली होती मारहाण? कामबंद अंदोलन शमले !

कल्याण आरटीओ कार्यालयातील बंडोबा बनले थंडोबा, एजंटाने केली होती मारहाण? कामबंद अंदोलन शमले !


कल्याण, (संजय कांबळे) : दोन दिवसापूर्वी कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मनिष जाधव नामक क्लार्क ला एजंट मच्छिंद्र केणे याने शुल्लक कारणावरून मारहाण केली होती. या विरोधात सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद अंदोलन पुकारुन मिडिया समोर मोठमोठ्या वल्गना केल्या होत्या, परंतु जबरदस्त राजकीय दबाव, आणि पोलिसांनी केलेली यशस्वी 'मध्यस्ती' यामुळे बंड करणारे हे" बंडोबा" अवघ्या दिड दोन दिवसात थंडोबा झाले आहेत. त्यामुळे कल्याण आरटीओ कार्यालयातील "व्यवहार" (कामकाज) सुरळीतपणे सुरू झाले आहेत. ही समाधानाची बाब आहे.


दोन दिवसांपूर्वी कल्याण आरटीओ कार्यालयातील लिपिक मनिष जाधव यांना एंजट मच्छिंद्र केणे यांनी थूंकण्याच्या शुल्लक कारणावरून मारहाण केली होती. या विरोधात कर्मचारी संघटनेने लेखणीबंद अंदोलन करुन 'हमसे जो टकराऐगा, मिट्टीमें मिलजायेगा,कामगार एकजुटीचा विजय असो, आरोपी वर सरकारी कामात अडथळा निर्माण केला, हा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशा घोषणा दिल्या होत्या, परंतु संबंधीत एजटांची राजकीय पाँवर, आणि खडकपाडा पोलिसांची शिष्टाई, मध्यस्थी, यामुळे अखेरीस हे प्रकरण केवळ एनसीतच गुंडाळून ठेवले आणि आरटीओ कार्यालयातील कामकाज सुरळीतपणे सुरू झाले.


यानंतर मात्र या एजंटाने केवळ ऐवढयाच शुल्लक कारणावरून ऐवढी मोठी रिस्क घेतली का?की अजून काही कारण होते, अशा चर्चेना उधाण आले.


शासकीय निमशासकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचार कमी व्हावा, नागरिकांना त्रास होऊ नये, त्यांची कामे विनाविलंब व्हावीत म्हणून भाजपा केंद्र सरकारने सर्व कामकाज आँनलाईन पद्धतीने सुरू केले, डिजिटल इंडिया चा नारा दिला, परंतु हे करत असताना आजही ग्रामीण भागात साधी लाईटची सोय नाही याचा विचार केला गेला का? महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील पहिले कँशलेस गाव ठरलेल्या ठाणे जिल्ह्यातील "धसई" ची आजची स्थिती काय? अशीच काहीशी अवस्था 'भ्रष्टाचाराची' आहे. भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी, लोक, बरोबर संधीचा लाभ कसा घेता येईल अशी व्यवस्था निर्माण करतात, अर्थात सगळ्यांंनाच एकाच चष्म्यातून पाहता येणार नाही, हेही तितकेच खरे आहे.

कल्याण आरटीओ कार्यालय सध्या एंजटाच्या व त्यांच्या टप-याच्या विळख्यात सापडले आहे, ते अनाधिकृत आहेत हे जगजाहीर आहे, ज्यांना वेळ नाही, कामधंदा, नोकरी, व्यवसाय गाठायचा आहे असे लोक आपसूकच एजंटाच्याकडे काम देतात, अशा वेळी ते पैशाचा मुळीच विचार करत नाहीत, पण आपले काम पुर्ण करून घेतात. त्यामुळे एजंट देखील अधिकारी व कर्मचारी यांंची सर्व "सेवा"करुन आपली कामे करुन घेतात. यामुळे यांची इतकी सलगी झालेली असते की, यांना कोणत्याही नियमांची मात्रा लागू पडत नाही. ते बिनधास्त खुर्ची, टेबल असे कुठेही बसून आपली कामे करून घेतात. यांच्या मध्ये एक "ऋणांनूबंध" निर्माण झालेला असतो. यामुळेच एजंटाप्रमाणे व्हीआयपी वागणूक सर्वसामान्य लोक, नागरिक यांना मिळत नाही. हे खरे नाही का?आपण लोकसेवक आहोत, घटनेने आपल्याला" अधिकार" दिले आहेत हे जरी खरे असले तरी त्याचबरोबर आपली "कर्तृत्व" देखील आहेत, हे सर्वानीच लक्षात घ्यायला हवे. अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी वरिष्ठांनी देखील काळजी घेऊन कडक उपाययोजना करायला हव्यात, अन्यथा म्हातारी मेली याचं दु:ख नाही, परंतु काळ सोसावेल, हे ध्यानात असू द्यावे, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यायलाच हवे!

प्रतिक्रिया

'कर्मचारी संघटना आहे, त्यांना अंदोलन करण्याचा अधिकारी आहे, परंतु आता कामकाज सुरळीतपणे सुरू आहे,- *तानाजी चव्हाण, आरटीओ, कल्याण.

'रस्त्यावर अनाधिकृत गाड्या धावतात, या विरोधात आरटीओचे अधिकारी व कर्मचारी काय कारवाई करतात, शहर वाहतूक पोलीसच अधिक कारवाई करतात *एक वरीष्ठ पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...