शेतकरी शेतमजुरांचे थकीत मानधन साठी सोमवारी लालबावटा शेतक-यांचे आंदोलन चोपडा...
जळगाव, बातमीदार : महाराष्ट्रातील अत्यल्पभूधारक, अल्पभूधारक, भूमीहिन शेतकरी, शेतमजूर तसेच विधवा, दिव्यांग महिला / पुरुषांना महाराष्ट्र शासनातर्फे श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी योजना, संजय गांधी योजना, राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना, अंतर्गत दरमहा हजार रुपये मानधन दिले जाते कुटुंब अर्थ साह्य योजने अंतर्गत मदत केली जाते परंतु गेल्या तीन महिन्यापासून या दुर्बल घटकांना सदर मानधनाचे वाटप न झाल्याने त्यांना आजारपण व उदरनिर्वाह साठी आर्थिक कुचंबणा सहन करावी लागत आहे. या लोकांना शासनाने दरमहा दिली जाणारे एक हजार रुपये थकीत मानधन अदा करावी, यासाठी व इतर मागण्यांसाठी लालबावटा युनियन- भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा- भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे चोपडा तहसीलदार कार्यालयावर सोमवार दिनांक ४ जुलै सोमवार रोजी सकाळी ११ वा धरणे आंदोलन केले जाणार आहे असा इशारा लालबावटा शेतमजूर युनियन नेते अमृत महाजन, वासुदेव कोळी, हिराबाई सोनवणे, शशिकला निंबाळकर, शीला बाविस्कर, संतोष कुंभार, शांताराम पाटील, नामदेव कोळी, छोटू पाटील, आरमान तडवी त्याचप्रमाणे जिजाबाई राणे, सरलाबाई देशमुख, आसाराम कोळी, गणेश धनगर आदी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment