Wednesday 29 June 2022

मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करत आहे , बंडखोरांना मोठे करुन मी पापाची फळं भोगत आहे; - उद्धव ठाकरे

मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करत आहे , बंडखोरांना मोठे करुन मी पापाची फळं भोगत आहे; - उद्धव ठाकरे


भिवंडी, दिं,२९, अरुण पाटील (कोपर) :
            राज्यात उद्या नव्या लोकशाहीचा पाळणा हालतोय. त्यांच्यामध्ये येऊ नका. शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला खाली खेचल्याचे पुण्य त्यांना मिळू द्या, असे भावनिक आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री साडेनऊ वाजता फेसबुक लाइव्हवरून मी  मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आहे.तसेच विधान परिषद सदस्याचा देखील राजीनामा दिल्याचे सांगितले आहे.बंडखोरांना मोठे करून मी पापाची फळे भोगत आहे असेही त्यांनी म्हटले आहे. 
              मला माझ्या शिवसैनिकांच्या रक्ताची होळी खेळायची नाही. मला मुख्यमंत्री पदच काय, आमदारकीही नको. उद्यापासून मी शिवसेना भवनात बसणार आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाला अखेर पूर्ण विराम मिळाला आहे.
          सर्वोच्च न्यायालयाने फ्लोअर टेस्ट करण्याचा राज्यपालांचा निर्णयाचे पालन करण्याचे निर्देश महाविकास आघाडीला दिले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हद्वारे जनतेशी रात्री साडे नऊ वाजता संवाद साधल.मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ज्यांनी आपल्याला मोठे केले असे लोक सत्ता आल्यावर आमच्यावरच नाराज होत आहेत. ज्यांना सगळे दिले ते नाराज झाले; मात्र ज्यांना काही दिले नाही ते सगळे आजही सोबत आहेत. ही शिवसेनेची ताकद आहे. आणि त्यामुळे न्याय देवतेचा निकाल आपन मान्य केला आहे.   
             काँग्रेसवाले बाहेरून पाठींबा द्यायला तयार आहेत, मात्र मी त्यांना तसे सांगितले नाही असेही ठाकरेंनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, नामांतर करूनही मी हिंदुत्व सोडले असे त्यांना वाटत असेल तर आम्ही काय करावे, तुम्ही सगळे माझ्यासोबत समोर येऊन बोलायला हवे. आम्ही तुम्हाला आपले मानले होते.
              मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, चीन बॉर्डरवरील संरक्षण काढून घेत मुंबईत आणण्यात येईल, याच शिवसैनिकांना तुमचा गुलाल उधळला 
तुम्ही त्यांचा रक्त वाहणार का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. उद्या तुम्ही या आणि शपथविधी करून घ्या आमचे शिवसैनिक मध्ये येणार नाही. माझा माणूस माझ्या  विरोधात उभ्या राहिल्याचा लाज वाटते आहे.
              बहुमताचा खेळ मला खेळाचा नाही. तुम्हाला मोठे केले हे माझे पाप आहे. माझ्या पापाची फळ मला भोगवी लागत आहेत, असे म्हणत बंडखोरांना इशारा दिला आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहे असेही ठाकरे म्हणाले.
               उद्धव  ठाकरे म्हणाले, उद्या एकाही शिवसैनिकांनी यांच्या अध्ये-मध्ये येऊ नका. कारण उद्या लोकशाहीचा नवा पाळणा हलतोय. मीही त्यांना सांगतोय, कुणीही तुमच्या मार्गात येणार नाही. या आणि घ्या शपथ. उद्या फ्लोअर टेस्ट आहे. कशालाही डोकी मोजत बसायची, डोक वापरण्यासाठी डोक्यांचा वापर व्हावा.
               उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्या विरोधात कोण आहे? किती आहेत? यात मला अजिबात रस नाही. मला खेळ खेळायचे नाहीत. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की, ज्यांना शिवसेनेनं जन्म दिला, शिवसेना प्रमुखांनी मोठं केलं त्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला मुख्य मंत्रिपदावरून खाली उतरवण्याचं पुण्य त्यांनाच लाभू द्या. त्यांचं हे पुण्य मला हिरावून घ्यायचं नाही. मला मुख्य मंत्रि पदाची ईच्छा अजिबात नाहीये. कारण मला पदाचा लालसा नव्हती.
                मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, अनेक आव्हाने आली आपण ती पार केली, न्यायदेवतेचा आज निकाल आला. त्यांचा निकाल मान्य करायलाच हवा. त्यांनी सुद्धा तातडीने फ्लोअर टेस्ट करण्याचा राज्यपालाचे आदेशाचे पालन करण्याचे सांगितले. राज्यपालाने लोकशाहीचा मान राखला. तातडीने चोवीस तासांच्या आत फ्लोअर टेस्ट करायला लावली. पण दिड पाऊने दोन वर्षे बारा आमदारांची यादी लटकवून ठेवली अशा भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या.                 
               मुख्यमंत्री जनतेला संबोधताना म्हणाले की, आता पुढची वाटचाल तुमच्या साथीने केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म स्थळाला निधी देत कामाची सुरुवात केली. माझे आयुष्य सार्थकी लागले आहे. कारण शिवसेनाप्रमुखांनी सांगितल्या प्रमाणे औरंगाबादचे नाव संभाजीनगर केले आहे.
               मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, उस्मानाबादचे नाव धाराशीव केले आहे. मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सहकार्यांचे आभार मानतो. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून या ठरावाला विरोध दिला नाही. मात्र पवार, गांधी यांनी मोठे सहकार्य केले. ज्यांचा विरोध त्यांनीच यासाठी साथ दिली असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

निलेश सांबरे यांचा न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे समाज रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान !!

निलेश सांबरे यांचा न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे समाज रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान !! कल्याण, प्रतिनिधी : जिजाऊ संघट...