📖✍️ मी गुरुजी बोलतोय.... (६)
*पुन्हा एकदा कुणबी राजकीय संघटन समितीसह सर्व कुणबी बांधवाना मनापासून शुभेच्छा !* (मागील पानावरून आता *ग्रामपंचायत....* कार्याकडे वळूया)
*अत्यंत महत्त्वाचे :* खरे तर ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुण वर्गाने या कामकाजाकडे लक्ष केंद्रित करायला हवे. जर ह्या शिक्षित पिढीने हा कारभार समजावून घेतला तर प्रत्येक घरातील अशिक्षित असलेल्या वाडवडिलांना सर्व योजना समजायला कोणती अडचण भासणार नाही.
*ग्रामपंचायत....*
*भारतातील स्थानिक स्वराज्य संस्था....*
*छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जात पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. हिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात. *ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये चालतो. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असतो.* ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.
*ग्रामपंचायत कायद्यातील कलमे.....*
*महारास्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ५ अन्वये प्रत्येक खेड्यासाठी एक ग्रामपंचायत असावी.*
ग्रामपंचायतीचे कार्य चालविण्यास गावातील लोक आपले प्रतिनिधी लोकसंख्येच्या प्रमाणात खालीलप्रमाणे प्रत्यक्ष मतदानाने निवडतील.
सदर सदस्यांचे मतदान हे प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने होईल.
*आरक्षण :- अ)* ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी एकूण जागा पैकी ५०% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
*ब)* अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत.
*क)* इतर मागासवर्गीय घटकामध्ये मोडणाऱ्यांसाठी लोकांकरीता २७ % जागा आरक्षित आहेत.
*सद्स्यांची पात्रता :- १)* तो गावातील ग्रामसभेचा सदस्य असावा.
*२)* त्याचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे.
*३)* त्याने वयाची २१ वर्षे पूर्ण केलेली असावीत.
कृषी व पतपुरवठा क्षेत्रातील सहकार सोसायटीच्या अध्यक्षांना सहयोगी सदस्य म्हणून घेता येते. मात्र त्यास ग्रामपंचायतीची परवानगी लागते, आता ही पद्धत बंद झाली आहे.
*मुदत – ग्रामपंचायतिची मुदत ५ वर्षांसाठी आहे.*
ग्रामपंचायत बरखास्तीनंतर ६ महिन्यात निवडणूक घेणे बंधनकारक आहे व कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळत नाही. *ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा अधिकार राज्यशासनास आहे. जर निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांनी राजीनामा दिला तर पोटनिवडणूक घेण्याचा निर्देश किंवा बरखास्तीचा निर्णय राज्यशासन घेते. त्या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी शासनाकडे पाठवितो.*
डोंगरी भागातील ३०० ते १५०० लोकसंख्येत सात सदस्य असतात.
*सरपंच व उपसरपंच.....*
ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख हा सरपंच असतो. *(२०१७ सालापासून सरपंचाची निवडणूक थेट जनतेमधून होत आहे).* सरपंच हे पद आरक्षित तर उपसरपंच हे पद खुले असून आरक्षणाची सोडत निवडणूक होण्याअगोदर जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात येते. निवडणुकीनंतर ग्रामपंचायतीची पहिली बैठक बोलाविण्याची अधिसूचना तेथील जिल्हाधिकारी काढतात. जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेला आधिकारी या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवितो. *क्रमशः*
शाहीर वसंत भातडे
*मो. ९९६७९८३३०२*
No comments:
Post a Comment