रोजगार सेवक हेच स्थलांतर रोखु शकतात - प्रदीप वाघ
जव्हार-जितेंद्र मोरघा
तालुक्यातील रोजगार सेवक यांनी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला असुन आज ग्राम रोजगार सेवक शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन उपसभापती प्रदीप वाघ यांना दिले.
यावेळी प्रदीप वाघ यांनी सांगितले की मी आपल्या सोबत ठाम पणे उभा असुन आपल्या सर्व मागण्या रास्त आहेत. शासनाने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, या साठी मी सर्व लोकप्रतिनिधी यांना संपर्क करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच त्यांनी रोजगार सेवक खऱ्या अर्थाने जनतेला काम उपलब्ध करून देतात व स्थलांतर रोखण्यासाठी एक प्रकारे मदतच करतात असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
आपण या मधुन लवकर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करु आपणही सहकार्य करावे असे आवाहन प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले. यावेळी भगवान कचरे, विलास गवारी,सोमा शिद, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment