कल्याण, (संजय कांबळे) : भ्रष्टाचार, आरोप प्रत्यारोप, घाणेरडे राजकारण, शेकडो तक्रारी आदी मुळे पुरते बदनाम झालेल्या म्हारळ गावात सध्या माणुसकीचे अनोखे दर्शन घडत आहे,ते म्हणजे गेल्या ४/५ दिवसापूर्वी गावातील सुर्यानगर परिसरात राहणा-या श्रीमती रंजना उमाजी कांबळे यांचे स्लँब कोसळून दु:खद निधन झालं, एक वर्षापूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले होते, त्यामुळे आईवडिलाविना पोरखे झालेल्या मुलांना आधार/ मदत देण्यासाठी, विविध संस्था, संघटना पुढे सरसावल्या असून आतापर्यत शेकडो लोकांनी मदत देऊ केली आहे, त्यामुळे म्हारळ गावात अनोख्या माणुसकीचे दर्शन पाह्याला मिळत आहे.
मागिल शुक्रवारी म्हारळ गावातील सुर्यानगर येथे राहणा-या श्रीमती रंजना उमाजी कांबळे या घरकाम करणा-या महिलेच्या अंगावर घराचे स्लँब कोसळून जागीच मृत्यू झाला होता तर मुलगी कु प्रज्ञा हि गंभीर जखमी झाली, मुलगा राज व दुसरी मुलगी बाजूला झोपायला गेल्याने सुदैवाने वाचली ,यांच्या वडिलांचे एक वर्षापूर्वी निधन झाले होते व आता आई ही निघून गेल्याने ही मुले पोरखी झाली आहेत.
अशातच मुलगी प्रज्ञा हिचा उजवा डोळा निकामी झाल्याची माहिती मिळत आहे, तसेच तिच्यावर ४/५ शस्त्रक्रिया करावयाच्या आहेत, निराधार झालेल्या कुंटूबाला म्हारळ गावातील आम्ही युवा प्रतिष्ठान ग्रुप, मी म्हारळकर आणि बौध्द विहार संघटना समन्वय समिती यांनी' एक हात मदतीचा,या शिर्षकाखाली तमाम नागरिकांना या पोरख्या झालेल्या अनाथाना मदत करण्याचे अवाहन केले ,आणि आश्चर्य बघताबघता कोणी, २०० कोणी ५०० एक हजार, दोन हजार अशी मदत सुरु झाली, आजमितीस सुमारे १०० च्या आसपास लोकांनी मदत केली आहे, शासनाची मदत मिळेल तेव्हा मिळेल पंरतू आपले काहीतरी कर्तव्य आहे, असे समजून या कुंटूबाला मदतीचा ओघ सुरु झाला आहे,
अत्यंत योग्य वेळी मदत देणे सुरु झाल्याने म्हारळगाव व परिसरातील तमाम दानशुर व यासाठी स्वत:ला झोकून देऊन काम करणा-या संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनीधी, यांचेही कौतूक व्हायलाच हवे, अपेक्षा इतकीच आहे की ही मदत "त्या निराधाराच्या "सत्कार्यी लागो, बस्स !
No comments:
Post a Comment