Wednesday 30 November 2022

अधिसंख्य पदावरील बोगस अदिवासींसाठी राज्य सरकारने घेतलेला निर्णय तमाम आदिवासी समाजावर अन्याय करणारा - आमदार डॉ. किरण लहामटे

अधिसंख्य पदावरील बोगस अदिवासींसाठी राज्य सरकारने घेतलेला निर्णय तमाम आदिवासी समाजावर अन्याय करणारा - आमदार डॉ. किरण लहामटे

पुणे, अखलाख देशमुख‌ : शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ देणारा निर्णय हा राज्यातील तमाम आदिवासी समाजावर अन्याय करणारा आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केला आहे. तसेच सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल लहामटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला. 

अधिसंख्य पदातील ७५ हजार बोगस आदिवासींना कायम करण्याचा आणि त्यांना पेंशन देण्याचा निर्णय हा आदिवासी समाजावर अन्याय करणारा आहे. यातून हे सरकार बोगस आदिवासींच्या मागे उभे आहे असा घणाघाती आरोप किरण लहामटे यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासी समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी तरतूद केली असताना आज आदिवासी मूळ प्रवाहात येऊ लागले असताना राज्य सरकार असा अन्याय करत आहे, अशी टीका त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली. त्यामुळे सर्व आदिवासी समजाने शिंदे- फडणवीस सरकारचा राज्यभरातून निषेध व्यक्त करावा, असे अवाहन त्यांनी यावेळी केले. भाजपला मूळातच आदिवासी समाज मान्य नाही त्यामुळे या समाजाला पायाखाली कुचलण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. यासाठी सर्व आदिवासी समाजाने एकत्र होऊन राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध करायला हवा, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...