Wednesday 30 November 2022

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबर वंचित ची युती भाजपाला मारणार तर मविआ ला तारणार ?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबर वंचित ची युती भाजपाला मारणार तर मविआ ला तारणार ?

कल्याण, (संजय कांबळे) : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यात सध्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. याचबरोबर क्रांतिवीर वस्ताद लहूजी साळवे यांच्या जाहिर कार्यक्रमात उध्दव ठाकरे सहभागी झाले, या सर्वाचा अंत्यत चांगला परिणाम बहुजन समाजावर झाला असून भविष्यात वंचित बरोबर युती झाल्यास याचा जबरदस्त फटका भाजपाला बसणार असून यामुळे महाविकास आघाडी ला तारणार असे चित्र दिसत आहे.

वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन समाजाला एकत्र करून वंचित आघाडी स्थापन केली, संपूर्ण महाराष्ट्रात याला चांगला प्रतिसाद मिळाला. सन २०१९ ,च्या सार्वत्रिक निवडणुकीत वंचित ला ९० हजार ते ३लाखाच्या आसपास मतदान मिळाले, सांगली, अकोला हिंगोली सोलापूर आदी जिल्ह्यात तर ,२/३, लाख मतदान झाले, दुर्दैवाने काँग्रेस, राष्ट्रवादी चे तब्बल ३७ उमेदवारांना याचा फटका बसला होता. या निवडणुकीत एकूण मतदानाच्या १४ टक्के मतदान वंचित ला झाले होते.
केवळ ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर भिवंडी लोकसभा मतदार संघात वंचित च्या उमेवारानी तब्बल ५१ हजार इतकी मते घेतली होती,तसेच कल्याण लोकसभा निवडणुकीत देखील वंचित ने चांगली कामगिरी केली होती.

सध्याचा विचार केला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड अनेकांना रुचले नाही, कल्याण डोंबिवली परिसरातील एका संस्थेने आँनलाईन केलेल्या सर्व्हे मध्ये सध्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच सर्वाधिक पंसती मिळाली आहे, याशिवाय हे राज्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालवत आहे का? अशा प्रश्नावर तब्बल ७०/८० टक्के लोकांनी हो असे उत्तर दिले आहे. तसेच हे सरकार स्थिर सरकार होईल का?अशा प्रश्नाला नाही असे म्हणणारे अधिक आहेत.

याशिवाय मुख्यमंत्री शिंदे गटाच्या आमदारांचे वादग्रस्त वक्तव्य, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार होणारा अपमान, वाढती महागाई, विविध उद्योग गुजरात ला जाणे, हेही कारणे आहेत च,अशातच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंचित बरोबर केलेली जवळीक, वस्ताद लहुजी साळवे यांच्या कार्यक्रमात सहभाग यामुळे गेली अनेक वर्षे शिवसेना पाण्यात पाहणारा मागासवर्गीय समाज बदलतोय, ठाणे जिल्ह्यातील भिंवडी, शहापूर, कल्याण, मुरबाड, अंबरनाथ आदी तालुक्यात वंचित आघाडीचे चांगले वर्चस्व आहे, ऐवढेच नाही तर अनेक ग्रामपंचायत मध्ये सदस्य, सरपंच, वंचित चे आहेत, भीम अनुयायांचा सुरुवातीपासून भाजपाला विरोध आहे.  इतर रिपब्लिकन गटाचे  अस्तित्व अत्यल्प आहे, त्यामुळे येत्या निवडणुकीत वंचित तस इतर गटाशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जवळीक साधली तर हे भाजपासाठी मारक व महाविकास आघाडीसाठी नक्कीच तारक ठरणार यात शंका नाही.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...