Wednesday, 30 November 2022

अंगणवाडी मदतनीस श्रीमती कोळी याना तीन महिन्याच्या आत सेवानिवृत्ती लाभ देण्याचां लोकायुक्तांचा आदेश !

अंगणवाडी मदतनीस श्रीमती कोळी याना तीन महिन्याच्या आत सेवानिवृत्ती लाभ देण्याचां लोकायुक्तांचा आदेश !

जळगाव, प्रतिनिधी : चोपडा तालुक्यातील आडगाव येथील अंगणवाडी मदतनीस श्रीमती सिंधुबाई शामराव कोळी या 30/7/2019 मध्ये 65 वर्षे वय झालेनंतर सेवानिवृत्त झाल्या. सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांना 30 एप्रिल 2014 पासून 20 वर्षे सेवेनंतर सेवानिवृत्ती लाभ अनुक्रमे एक लाख रुपये व 75 हजार रुपये देण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार श्रीमती सिंधुबाई शामराव कोळी या 1989 ते 2019 पर्यंत सुमारे 30 वर्षे अंगणवाडी केंद्रामध्ये मदतनीस म्हणून कार्यरत होत्या तेव्हा सेवा निवृत्त झाल्यानंतर एकात्मिक बाल विकास योजना कार्यालयाने विमा कॉर्पोरेशन कंपनी शी केलेल्या करारप्रमाने महाराष्ट्र शासनाने त्यांच्या सेवा निवृत्ती द्यावयास पाहिजे होती परंतु त्यांनाच काय ?जळगाव जिल्ह्यात 2017 /18 पासून सेवानिवृत्त झालेल्या सुमारे 600/700 सेविका मदतनिसांना भारतीय जीवन विमा निगम कंपनी मार्फत त्यांचे सेवानिवृत्त लाभ मिळत नाहीत. वयाच्या 65 व्या वर्षी सेवानिवृत्ती झाल्यानंतर सेविका किंवा मदतनीस यांची शारीरिक क्षमता संपते त्यांना विविध आजांर ही बळावत असतात अशा तऱ्हेने जिल्ह्यात सहा सातशे सेविका मदतीस सेवानिवृत्त झालेल्या आहेत त्या स्थानिक कार्यालयाचे उंबरठे जिजवत आहेत अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन जळगाव जिल्हा व त्या सरकारकडे सतत पत्रे वार करीत असतात परंतु त्यांच्या पत्राची दखलही कोणी घेत नाही म्हणून श्रीमती सिंधुबाई शामराव कोळी 2 वर्षे वाट पाहिली कार्यालयाकडे आवश्यक ती कागदपत्रे जमा केली. पण लाभ न मिळाल्याने त्यांनी अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष का अमृतराव महाजन यांच्या मार्फत लोकायुक्त मुंबई यांच्याकडे दिनांक 7/5/ 2021 रोजी अपील केले त्या आपिलावर सुनावणी आली असता न्यायमूर्ती व्ही एम कानडे यांनी बाल विकास सेवा योजना चोपडा आदिवासी प्रकल्पा चे प्रकल्पधिकारी यांना 11/ 11/ 2022 रोजी आदेश दिला की, त्यांची तक्रारीनुसार तीन महिन्याच्या आत त्यांना सेवानिवृत्ती लाभ देण्यात यावा व लाभ दिल्याचे पत्र लोकांच्या कार्यालयास एक महिन्याच्या आत सादर करावे..

No comments:

Post a Comment

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी !!

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी !! ** ३१ तास चाललेल्या पालखी सोहळ्यात ग्रामस्थांनी देवीचे शांततेत दर्शन घेत हजारो भाव...