Sunday 27 November 2022

ग्रामपंचायत वेळंब मध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न !

ग्रामपंचायत वेळंब मध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न !

*निवोश / गुहागर: उदय दणदणे*

देशात २६ नोव्हेंबर हा दिवस प्रत्येक नागरिकांसाठी फार महत्वाचा आहे. जगण्याचा खरा अधिकार राजमार्ग  प्राप्त झाला असा तो दिवस भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथांग प्रयत्नातून भारताचे संविधान लिहिले गेले व  २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत पारित केले गेले. धर्मनिरपेक्ष लोकशाही  व अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले तो  हा दिवस  संविधान दिन  म्हणून देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत वेळंब येथे संविधान दिनाप्रति भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर भारतीय संविधानाची शपथ घेण्यात आली व वेळंब बाजारपेठ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे स्तंभाला पुष्पहार अर्पण करून वेळंब बौद्धवाडी विहार येथे सर्व वाडीतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमाला वेळंब ग्रामपंचायत सरपंच -समीक्षा बारगोडे , उपसरपंच- श्रीकांत मोरे, पोलीस पाटील - स्वप्नील बारगोडे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...