Monday, 28 November 2022

कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा वरप येथे संपन्न !

कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा वरप येथे संपन्न !

कल्याण, (संजय कांबळे) : क्रांतीबा महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून आणि डाँ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाचे निमित्ताने आयोजित तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा नुकताच वरप येथील सेक्रेट हार्ट शाळेत मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला, कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन  करण्यात आले होते,

यावेळी व्यासपिठावर जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पाताई पाटील, उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण व अर्थ समिती, सुभाष पवार, आ किसन कथोरे,महिला बालकल्याण सभापती रेश्मा मगर, झेडपी सदस्या जयश्री सासे, वृशाली शेवाळे, रमेश पाटील, कल्याण पंचायत समितीच्या सभापती अस्मिता जाधव, सदस्य रंजना देशमुख, दर्शना जाधव, रमेश बांगर, पांडूरंग म्हात्रे, यशवंत दळवी, रेश्मा भोईर, भारती टेंबे, गटविकास अधिकारी अशोक भवारी, गटशिक्षणाधिकारी डाँ रुपाली खोमणे व शिक्षणविस्तार अधिकारी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रारंभी प्रतिमा पूजन झाल्यावर जिपशाळा म्हसरोंडी च्या विद्यार्थांनी स्वागतगीत सादर केले, तथपूर्वी आमदार किसन कथोरे मधेच कार्यक्रमातून उठून निघून गेल्याने उपस्थितामध्ये उलटसुलट चर्चा सुरु झाली‌.

दरम्यान गटशिक्षणाधिकारी डाँ रुपाली खोमणे यांनी प्रास्ताविक केले, त्या म्हणाल्या, कल्याण तालुका भोगोलिक दृष्ट्या महत्वाचा आहे, जिप शाळेचा दर्जा उचावंत असून आजमितीस शाळेची विद्यार्थी संख्या १०  हजार २७१ इतकी आहे, शासनाच्या हरघरमे तिंरगा मध्ये खडवली केंद्रातून सुमारे ४ हजार मुलांनी सहभाग घेतला, तर १४२ शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याचे सांगितले, शिवाय आजचा शिक्षक पुरस्कार केवळ गुणवत्तूवर आधारीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

तर गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी आपल्या छोटेखानी भाषणात सांगितलेकी शिक्षकांनी संधीचा फायदा घेऊन मुलांना सहभागी  करुन त्यांना क्रियाशील शिक्षण द्यावे,यावेळी त्यांनी संत गाडगेबाबा,सानेगुरुजी यांची उदाहरणे दिली, शिक्षकानी झुंड निर्माण करण्यापेक्षा गुणवान व क्रियाशील विद्याथ्याची फौज निर्माण करावी असे अवाहन शिक्षकांना केले‌

तर झेडपी उपाध्यक्ष सुभाष पवार म्हणाले, शिक्षकांचे योगदान मोठे आहे, शिक्षकांचा आदर वाढला पाहिजे असे काम शिक्षकांनी करावे असे सांगून जिल्हात ७१० शिक्षकांची कमतरता आहे, जिल्हयातील पाचही तालुक्यात गटशिक्षणाधिकारी पदे भरली असल्याचे त्यांनी सांगितले, हा कार्यक्रम चांगला व्हावा यासाठी खर्चाची तरतूद डब्बल केली आहे, असे बोलून स्पर्धा परीक्षेत कल्याण तालुक्याचे प्रतिनिधित्व नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली, शिवाय यापुढे कार्यक्रम वेळेवर सुरु करावा, अशा सूचना केल्या,यामुळे आमदार महोदय निघून गेल्याचे सांगितले.

यानंतर झेडपी अध्यक्षा पुष्षा पाटील, सभापती अस्मिता जाधव, झेडपी सदस्या जयश्री सासे, वृशाली शेवाळे आदींचीही भाषणे झाली.

यावेळी तालुका स्तरीय आदर्श पुरस्कार मिळालेल्या धनाजी गायकर (जिपशाळा), पावशेपाडा,) श्रीमती संध्या पवार (वडवली), सुनील तुपसौदर्य, (उशीद) सुनीता बेंडसे (कोंळिंब) संतोष भागवत (घोटसई) संजय होण्याळकर (सोनारपाडा) आणि शर्मिला गायकवाड (बामल्ली) या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, ट्राफी व प्रमाणपत्र देऊन गोरविण्यात आले.

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन करताना  गटविकास अधिकारी  अशोक भवारी यांनी  मान्यवरांनी व्यक्त केलेली खंत व इतर चुका बद्दल  प्रशासनाचे  प्रमुख म्हणून दिलगिरी व्यक्त केली,
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, समग्रशिक्षा अभियान व शिक्षणविभाग कर्मचारी वृंद यांनी मेहणत घेतली.

No comments:

Post a Comment

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !!

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !! पेण, (पंकजकुमार पाटील) - खारेपाट भागातील विठ्ठल नगर या गावात दरवर्षी प्रमाणे नाथस...