शिक्षकांनी शालेय वेळेचे बंधन पाळावे- प्रदिप वाघ
जव्हार-जितेंद्र मोरघा
विविध केंद्रांवर शिक्षण परिषदे चे आयोजन तालुक्यात करण्यात आले होते यावेळी संबोधन करताना प्रदीप वाघ यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे, यासाठी शालेय वेळेचे नियोजन केले पाहिजे व पुर्ण वेळ शाळेत आपण उपस्थित रहावे.
कुणीही कर्तव्यात कसूर केला तर योग्य ती कारवाई केली जाईल अशी सुचना प्रदीप वाघ यांनी शिक्षकांना दिली आहे.
तसेच गुणंवत व उपक्रमशील शिक्षक यांचे कौतुक देखील केले व अशा शिक्षकांचा आदर्श देखील इतरांनी घ्यावा असे हि ते यावेळी म्हणाले.
आज दुधगाव, जोगलवाडी ,कारेगाव येथील शिक्षण परिषदे मध्ये शिक्षकांनी विविध उपक्रमांची माहिती दिली,
यावेळी प्रदीप वाघ उपसभापती, नंदकुमार वाघ विस्तार अधिकारी, सरपंच सुलोचना गारे, उपसरपंच हनुमंत फसाळे, भरत गारे गुरुजी, केंद्र प्रमुख, सखाराम रेरे, कांबळे, विरकर सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते
No comments:
Post a Comment