Sunday 26 February 2023

विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल यांची भेट !

विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल यांची भेट !

मुंबई, अखलाख देशमुख‌, दि २६ : 
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडत सध्याच्या सरकारच्या संवेदना हरवल्या असून हे तडजोडीचे सरकार काही फार दिवस टिकणार नाही असे सांगत राज्यात गुन्हेगारी वाढली असून लोकप्रतिनिधी सुध्दा सुरक्षित नाहीत असे सांगून उद्या सोमवार २७ फेब्रुवारी पासून सुरू होणारे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याचे संकेत विरोधकांनी दिले आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंधेला सरकारच्या चहा पानावर बहिष्कार घालत विरोधकांनी सडकून टीका केली.

तसेच महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांची विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आज विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने राजभवन येथे जावून सदिच्छा भेट घेतली. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री अनिल परब,माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार अनिल पाटील, आमदार सुनील प्रभू, आमदार कपिल पाटील, आमदार विनोद निकोले उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...