निवडणुका डोळयासमोर ठेवुन सादर केलेलं बजेट - शेख युसूफ लिडर
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १ : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थमंत्री म्हणुन पाचवा अर्थसंकल्प सादर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुस-या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पावर औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांनी पाच ट्रिलिअन डॉलर चे काय झाले असा सवाल मोदी सरकारला केला व केद्र सरकारचा निषेध केला. खास करुन महाराष्ट्रसाठी या बजेट मध्ये निराशा झाली. यामध्ये युवकाना नोक-या, रोजगार, उदयोग, महिलांना गॅस दर वाढ, पेट्रोल डिजेल, सी.एन.जी यामध्ये वाढ करुन निराशा बघण्यात आली. युवकांच्या शिक्षणासाठी सुध्दा हि निराशा दिसुन आली. कृषी क्षेत्र, आरोग्य सेवा व तरुणांना सक्षम बनविण्यासाठी आजच्या जगात कृत्रिम बुध्दीमत्त्ता हे महत्वाचे साधन आहे तरी पण यांच्या हाती या बजेटमध्ये काही येतांना दिसत नाही. अशी प्रतिक्रीया औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांनी दिली.
No comments:
Post a Comment