दहावीच्या निकालात परत मुलींनीच मारली बाजी !!
या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ४१ हजार ६६६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख २९ हजार ०९६ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यातील १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.८३ आहे.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेस नोंदणी केलेल्या एक वा दोन विषयात उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना प्रचलित पद्धतीप्रमाणे 'एटीकेटी'ची सुविधा लागू राहील.
No comments:
Post a Comment