Tuesday 22 August 2023

कल्याण तालुक्यातील कुंदे जिल्हा परिषद शाळेत अज्ञाताकडून विकृत मनोवृत्तीचा कळस, परिसरात संतापाची लाट?

कल्याण तालुक्यातील कुंदे जिल्हा परिषद शाळेत अज्ञाताकडून विकृत मनोवृत्तीचा कळस, परिसरात संतापाची लाट?

कल्याण, (संजय कांबळे) : शाळांना विद्यादानाचे पवित्र मंदिर म्हटलें जाते, मात्र याच मंदिरात शौचास बसून आपल्या विकृत मनोवृत्तीचा प्रकार कल्याण तालुक्यातील कुंदे जिल्हा परिषद शाळेत घडला असून यामुळे या अज्ञाताविरोधात परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

कल्याण तालुक्यात १२० च्या आसपास जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. विद्यादानाचे पवित्र कार्य या मंदिरातून चालते, देशाचे भावी नागरिक घडविण्याची मोठी जबाबदारी या शाळांवर असते आणि शाळेतील 'गुरुजी, अध्यापनाच्या माध्यमातून ती इमानेइतबारे पार पाडत असतात. मात्र अलीकडच्या काळात राजकारणापासून अलिप्त राहिलेल्या किंवा तशी अपेक्षा असलेल्या या विभागातच सर्वाधिक राजकारण सुरू झाले आहे. हे विविध ठिकाणच्या शिक्षकांच्या सभामध्ये होणाऱ्या हाणामाऱ्या, टेबल खुर्च्या फेकाफेकी यावरून दिसून येत आहे. इतकेंच नव्हे तर हे राजकारण इतक्या खालच्या पातळीवर गेले आहे की आपण काय करतो?कुठे करतो? याचेही भान राहिलेले नाही.

तालुक्यातील कुंदे गावात जिल्हा परिषदेची इयत्ता ४ थी पर्यंत शाळा आहे. २ शिक्षक व २ वर्ग खोल्या, असलेल्या या शाळेत ४५ विद्यार्थी ज्ञान घेण्याचे काम करतात. शाळेला स्लाईडिंगच्या खिडक्या आहेत, याच खिडकीतून आत शिरुर कोणीतरी माथेफिरू, विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने वर्गात 'संडास, केले, १५ ऑगस्ट ला हा किळसवाणा प्रकार लक्षात आल्यानंतर कसेबसे वर्ग स्वच्छ केला, शाळेचे मुख्याध्यापक अरुण भामरे यांनी हा सर्व प्रकार गावातील ग्रामस्थांच्या लक्षात आणून दिला. परंतु यानंतर पुन्हा मंगळवार दि २२ ऑगस्ट रोजी परत असाच प्रकार केला. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी संतापले, व खिडकीला ग्रील बसवण्याचा निर्णय घेतला, परंतु यानंतर असेच चालू राहिले तर मात्र पोलीस तक्रार करणार असल्याचे मुख्याध्यापक भांमरे सर यांनी सांगितले.

दरम्यान हा काय पहिलाच प्रकार नाही, तालुक्यातील म्हारळ जिप शाळेत तर पंखे, पत्रे, स्पिकर, ग्रील, असे बरेच साहित्य चोरट्यांनी चोरून नेले होते. वरप जिप शाळेच्या खिडक्या च्या काचा जागेवर राहिल्या नव्हत्या, तर इतर ठिकाणी शाळेच्या आवारात, व्हराड्यांत तळीरामानी गटारी जोशात साजरी केल्याच्या घटना घडलेल्या होत्या.. इतकेच नव्हे तर या पवित्र ठिकाणी दारुच्या बाटल्या, कंडोम असे साहित्य देखील सापडले होते. शाळांच्या शौचालयामध्ये चित्रविचित्र आकृत्या दिसून आल्या होत्या, या सर्वावरुन खरेच विद्येचे पवित्र मंदिर सुरक्षित व पवित्र राहिले आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. गावातील कोणीतरी विक्षिप्त, विघ्नसंतोषी, विकृत व्यक्ती असे वाईट कृत्य करतो व संपूर्ण गावाची बदनामी होते हे थांबायला हवे, ती जबाबदारी देखील ग्रामस्थ म्हणून आपलीच आहे.
सुदैवाने सध्या तालुक्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांना संरक्षक भिंत व वाँल कंपाऊंड आहे, दरवाजे, खिडक्या यांना ग्रील लावलेले आहेत, तरीही शाळांचे पावित्र्य जपणे हे शिक्षकासह गावातील नागरिक, ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांची जबाबदारी आहे.हे नाकारुन चालणार नाही.

No comments:

Post a Comment

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !!

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !! *संध्या 5 वा.  सिव्हील लाईन जि.प. विश्रामगृह, सिविल लाईन चौ...