Tuesday, 22 August 2023

पेण तालुक्यातील शिशिर धारकर यांनी शिव बंधन बांधून केला शेकडो कार्यकर्त्यासह उद्धव ठाकरे गटात प्रवेश !!

पेण तालुक्यातील शिशिर धारकर यांनी शिव बंधन बांधून केला शेकडो कार्यकर्त्यासह उद्धव ठाकरे गटात प्रवेश !!

भिवंडी, दिं,२२,अरुण पाटील (कोपर)
           रायगड जिल्ह्यातील पेणचे माजी नगरअध्यक्ष शिशिर धारकर यांनी २५० वाहनांचा ताफा घेउन आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुबईतील मातोश्री निवासस्थानी शिव बंधन बांधून ऊद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेत      मोठया थाटात प्रवेश केला आहे. 

           शिशिर धारकर यांचा पक्षप्रवेश पेणच्या राजकारणाला कलाटणी देणारा आहे. मी उद्धव ठाकरेंना शब्द देतो की, आगामी निवडणुकीत पेणचा आमदार आपलाच असणार आहे असं त्यांनी म्हटलं. तर तुम्ही सगळे आता शिवसैनिक झालात. तुमचं स्वागत मनापासून करतो. तुम्ही लढवय्यांच्या सेनेत प्रवेश केला आहे. काही जणांचे नाव मोठे होते, पण डोळे वटारल्यावर पळून गेले. अन्याय सहन करायचा नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. 
          त्याचसोबत शिशिर धारकर यांना सोपा मार्ग होता, वॉशिंग मशिनमध्ये तुम्हीही जाऊ शकला असता. पण तुम्ही त्यातले नाहीत. कर नाही त्याला डर कशाला? वॉशिंग मशिनमध्ये जाण्याऐवजी तुम्ही लढवय्यांच्या सेनेत आलात. सगळे शिवसैनिक तुमच्यासोबत आहेत. फक्त पेणच नव्हे तर चांदा ते बांदा आपल्याला सत्ताबदल करायचा आहे. आपल्याला शहाणपणाची सत्ता आणायची आहे. सध्या लोकांना मुर्ख बनवण्याचे काम सुरू आहे. परंतु ते जास्त काळ चालणार नाही. आता मी बोलायचे थांबतो, जे काही बोलायचे ते पेणला येऊन जाहीर सभेतच बोलेन अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि शिंदे गटावर निशाणा साधला.                       एकेकाळी पेण नगरपालिकेवर धारकर घराण्याचे वर्चस्व होते, परंतु पेण अर्बन बँकेच्या घोटाळ्यामुळे या वर्चस्वाला धक्का बसला. शिशिर धारकर हे पेणचे माजी नगराध्यक्ष आहेत. त्याचसोबत पेण अर्बन बँक घोटाळ्यातील ते आरोपी होते. ५०० कोटीहून अधिक घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पेण अर्बन बँकेत अनेक स्थानिक लोकांचा पैसा होता. हा पैसा बँक घोटाळ्यात बुडला. त्यामुळे लोकांमध्ये संतप्त भावना आहे. गेल्या काही वर्षापासून शिशिर धारकर सक्रीय राजकारणापासून दूर होते. आता शिशिर धारकर यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने त्याचा किती फायदा ठाकरे गटाला होतो हे पाहणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment

"फांद्या कितीही उंच झाल्या तरी मुळाशी नातं ठेवावंच लागतं."-- ह भ प चारुदत्त आफळे

"फांद्या कितीही उंच झाल्या तरी मुळाशी नातं ठेवावंच लागतं."-- ह भ प चारुदत्त आफळे    कल्याण, अतुल फडके :     आज उच्च शि...