Monday, 21 August 2023

कल्याण तालुक्यातील रस्त्यावरील खड्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचा रास्तारोकोचा इशारा !

कल्याण तालुक्यातील रस्त्यावरील खड्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचा रास्तारोकोचा इशारा !

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यासह टिटवाळा परिसरात मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. यामुळे नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात खड्डे भरले नाहीत, तर प्रत्येक रस्त्यावर ओळीने रास्ता रोखो करण्याचा इशारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिला आहे. तसे निवेदन कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहे.

कल्याण तालुक्यातील कल्याण मुरबाड, टिटवाळा, शहापूर या रस्त्यासह टिटवाळा फळेगावा, गेरसे, पळसोली, पाजरपोळ अंबरनाथ, निंबवली, राये खडवली, निंबवली पिसे रस्ता, टिटवाळा गुरवली, बापसई बेलकरपाडा, राये ओझर्ली, रायते आपटी आदी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, 

केवळ कागदोपत्री खड्डे भरून लाखोंची उधळपट्टी केली असल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर आतापर्यंत अनेकांचे अपघात झाले आहेत. कित्येकांना जीव गमवावा लागला आहे. परंतु याचे सरकारला काही सोयरसुतक दिसत नाही,नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर गवत वाढलेले आहे, यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही हे देखील धोकादायक आहे. 

तालुक्यातील  नद्यांच्या पुलाची सरक्षंक खांब वाहून गेले आहेत, यावरून प्रवास करणे जीवघेणे ठरु शकते आणि हे शिवसेना ठाकरे गट खपवून घेणार नाही असा इशारा तालुका प्रमुख विश्वनाथ जाधव यांनी निवेदन देताना दिला आहे, त्यामुळे येत्या आठवडाभरात हे खड्डे बुजवून, रस्त्याचे नूतनीकरण करून लोकांची गैरसोय दूर झाली नाही तर या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. तसे निवेदन कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी, तहसीलदार जयराज देशमुख, आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. 

यावेळी तालुका प्रमुख विश्वनाथ जाधव, माझी उपसभापती रमेश बांगर, शिवसैनिक नरेश सुरोशे, कैलास मगर, बळीराम फिरगांणे, उप तालुका प्रमुख बाज्या भालेकर, नितीन चौधरी, अनिल सुरोशे, जनार्दन गायकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

"फांद्या कितीही उंच झाल्या तरी मुळाशी नातं ठेवावंच लागतं."-- ह भ प चारुदत्त आफळे

"फांद्या कितीही उंच झाल्या तरी मुळाशी नातं ठेवावंच लागतं."-- ह भ प चारुदत्त आफळे    कल्याण, अतुल फडके :     आज उच्च शि...