भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी घेतला आढावा !!
कल्याण, प्रतिनिधी : महायुतीत कोणाकडे किती जागा असतील, कोण किती जागा लढवतील, याबाबतचा निर्णय राज्यातील नेते आणि केंद्रीय पार्लमेंट बोर्ड ठरवेल. राज्यातील ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा मानस आहे, त्यामुळे लोकसभेत महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराच्या विजयाची जबाबदारी भाजपची असेल, असे सांगून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी कल्याण पश्चिम येथे महायुतीच्या निवडणूक स्ट्रॅटेजीबद्दल भाष्य केले.
चंद्रशेखर बावनकुळे भिवंडी लोकसभा दौऱ्यावर आहेत. त्यांनी कल्याण, शहापूर आणि मुरबाड विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला. कल्याण पश्चिमेला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.कल्याण पश्चिम येथे घर चलो अभियान, पदाधिकारी-सुपर वॉरिअर्सशी संवाद साधला. राज्यातील प्रत्येक खासदाराने ५१ टक्के मतं घेऊन निवडून यावे, यासाठी जनसंवाद यात्रा काढण्यात आली आहे. पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी ही माहिती दिली.
यावेळी केंद्रीय पंचायती राज मंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, मा. आमदार नरेंद्र पवार, कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र (नाना) सुर्यवंशी, कल्याण पश्चिम शहर प्रमुख वरुण पाटील, महिला शहर प्रमुख वैशाली ताई पाटील, पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित होते.
No comments:
Post a Comment