त्याचप्रमाणे त्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात विविध बैठका, सभा, भेटीगाठी असे कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या संदर्भात सविस्तर ___
दिनांक २८ ऑक्टोबर रोजी भिवंडी लोकसभा मतदारसंघात कल्याण पश्चिम, मुरबाड, शहापूर विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची संघटनात्मक बैठक तसेच त्या नंतर अहिल्याबाई चौक ते टिळक चौक या दरम्यान नागरिकांसोबत घर चलो अभियान असा कार्यक्रम आयोजित केला आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दुसऱ्या दिवशी दिनांक २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.०० वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मुंब्रा-कळवा, कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ या सहाही विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून डोंबिवली मध्ये फडके रोड परिसरात नागरिकांसोबत घर चलो अभियान तर उल्हासनगर येथे देखील नागरिकांसोबत घर चलो अभियान असा कार्यक्रम आयोजित केला आहे, रात्री ९.०० वाजता कोअर कमिटीची बैठक होणार यानंतर या दोऱ्याची सांगता होईल.
यावेळी मा. कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण, कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी, शशिकांत कांबळे, व पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment