Friday 24 November 2023

कोकणात आंगवली -रेवाळेवाडीत तुळशी विवाह थाटामाटात संपन्न !!

कोकणात आंगवली -रेवाळेवाडीत तुळशी विवाह थाटामाटात  संपन्न !!

कोकण, (शांताराम गुडेकर) :
            भारतीय संस्कृतीमध्ये सण आणि उत्सवांना अतिशय महत्त्वा आहे. दिवाळी हा या सर्व सण उत्सवात आनंदाचा आणि महत्त्वाचा सण. ज्यामध्ये गोडधोड पदार्थ केले जातात. शाळांनाही सुट्ट्या असतात. सर्वत्र धमाल असते. ही धमाल जवळपास तुलसी विवाहापर्यंत चालते. महाराष्ट्र आणि देशभरात तुळसी विवाह हा दिवाळीनंतर १५ दिवसांनी येणारा एक महत्त्वाचा कार्यक्रम मानला जातो. जो साधारण सायंकाळी ते रात्री दरम्यान साजरा केला जातो. खरे तर तुळस ही एक बहूउपयोगी आणि औषधी वनस्पती आहे. जी सर्वसाधारणपणे सर्वांच्या अंगणात वृंदावनावर पाहायला मिळते.अशाच तुळशीची लग्ने घराघरांमध्ये लावली जातात. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला प्रदोष काळात तुळशी विवाह साजरा केला जातो. या दिवशी सूर्यास्तानंतर तुळशीजींचा विवाह शालिग्रामजींशी होतो. धार्मिक विधीनुसार तुळशी विवाह केल्याने त्याच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत नाहीत आणि नात्यात प्रेम आणि गोडवा वाढतो. यावर्षी २४ नोव्हेंबर २०२३ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील आंगवली -रेवाळेवाडी येथे  तुळशीचा विवाह संपन्न झाला. वाडीमधील रेवाळे, आग्रे, गुडेकर, धनावडे, चव्हाण कुटुंबियांनी यामध्ये सहभाग घेतला. काशिराम केशव रेवाळे, आत्माराम रेवाळे, शांताराम रेवाळे, शशिकांत आग्रे, दत्ताराम गुडेकर, तुकाराम गुडेकर, संदीप चव्हाण, संतोष रेवाळे, वामन रेवाळे, राजेश रेवाळे, योगेश रेवाळे, संदीप रेवाळे, सुधाकर रेवाळे, विश्राम रेवाळे, अशोक रेवाळे आणि सहभागी रेवाळे, गुडेकर, चव्हाण, आग्रे, धनावडे बंधू यावेळी उपस्थित होते. यंदा तुळशी विवाहच्या दिवशी अमृत सिद्धी योगासह तीन अद्भुत योग जुळून येत आहेत. या दिवशी वैवाहिक जीवनात सुखासाठी अनेक विशेष उपाय केलेजातात. आषाढ शुक्ल पक्षातील देवशयनी एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णू चार महिने योग निद्रामध्ये लीन होतात आणि कार्तिक महिन्याच्या देवूथनी त. भगवान विष्णूच्या जागरणानंतर तुळशीचा शिलाग्राम अवताराशी विवाह करण्यात आला.

           हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य लाभते, तिच्या पानावरचे उदक मस्तकावर धारण केले तर गंगास्नानाचे पुण्य लाभते आणि मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्ती वैकुंठास जाते.इतके हिंदू धर्मातील धारणेमध्‍ये तुळशीला महत्त्व आहे.

"तुळसीचे पान.एक त्रैलोक्य समान आहे.
उठोनिया प्रातःकाळी, वंदी तुळसी माऊली |
नाही आणिक साधन, एक पूजन तुळसीचे
न लगे तीर्थाधना जाणे, नित्य पूजने तुळसीसी
योगायोग न लगे काही, तुळसीवाचुनी देव नाही"

अशा शब्दांत संत एकनाथांनी तुळशीचे श्रेष्ठत्व सांगितले आहे. तुळशीमध्ये कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन वायू सोडण्याचा गुणधर्म जास्त असल्यामुळे शरीर निरोगी राखण्यास तिचा उपयोग होतो.दारात वा घरात तुळशीचे झाड असल्यास घरात पिसवा, हिवतापाचे जंतू शिरकाव करत नाहीत. तुळस प्रदूषणनाशक आहे. ताप, सर्दी, खोकला दूर करणे, हवा शुद्ध करणे हे तिचे महत्त्वाचे गुणधर्म आहेत. हिंदूंच्या अंत:करणात तुळशीसंबंधात पूज्यभाव आहेच; पण इतर धर्मीयदेखील तुळशीबद्दल आदर दाखवतात.तुळशी विवाह लावण्या एवढीच तिचे पावित्र्य जपणे ही आपलीच जबाबदारी आहे.ती प्रत्येक व्यक्तीने पार पाडायला हवी.

                                            शब्दांकन - शांताराम गुडेकर (लेखक, कवि, पत्रकार)
                                                               +91 98207 93759

1 comment:

  1. अतिशय सुंदर सोहळा.
    तुळसीचे महत्व आणि हिंदू धर्मातील परंपरांचा उत्तम आढावा या लेखाच्या माध्यमातून घेतला आहे. अभिनंदन.

    ReplyDelete

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !!

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !! *संध्या 5 वा.  सिव्हील लाईन जि.प. विश्रामगृह, सिविल लाईन चौ...