अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप 24 वा दिवस... महिला बाल विकास आयुक्त यांच्या पत्रकाची होळी.!!
*ग्रामीण विकास मंत्र्यांचा निषेध !!*
चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रातील दोन लाख अंगणवाडी सेविका मदतनीस गेल्या चार डिसेंबर पासून संपावर आहेत. या संपकरी कर्मचाऱ्यांचा प्रश्नांवर तोडगा काढणे तर दूरच; पण नागपूर विधानसभेत माजी महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या विचारलेल्या प्रश्नाला सकारात्मक उत्तर देण्याऐवजी नकारात्मक राजकीय भाषेत उत्तर दिले त्याबद्दल ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या कर्मचारी विरोधी भूमिकेबद्दल काल रोजी चोपड्यात संतप्त निषेध करण्यात आला व आणि त्यांचे भाषण कमी की काय? गेल्या 22 डिसेंबर 23 रोजी महिला बालकल्याण आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल यांनी सुद्धा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाचे आगीत सतरा मुद्द्यांचे तेल ओतणारे पत्रक काढून कर्मचाऱ्यांचया मागण्यांबाबत जी असंवेदनशीलता दाखवली आहे त्यात अंगणवाडीचा खाऊ आशा, बचत गट ,पंचायत राज चालक मंडळ, प्राथमिक शाळा शिक्षक यांनी हस्तांतरित करून घ्यावा जणू काही हे विभाग यांच्याच अखत्यारीत येतात. अशा अविर्भावात पत्र काढलेले आहे. आणि त्यावर कडी म्हणजे मुख्य सेविका यांनीच खाऊ वाटप करावा असेही म्हटले आहे आधीच बचत गटांना खाऊ शिजवणे चे काम एप्रिल २३ पासून बंद केले आहे, त्यांची गेल्या तीन महिन्यांची थकीत बिल दिलेले नाहीत. दुसरीकडे हल्लीं जे खाऊ शिजतात त्यांचेही सात महिन्यांची बिल देखील दिलेली नाहीत आणि आशा वर्कर व प्रा शिक्षक त्यांची काम करतील की अंगणवाडीची काम करतील? असे महिला बाल विकास आयुक्त श्रीमती रुबल यांनी काढलेल्या अशा विसंगती पूर्ण परिपत्रकाचा चोपडा तालुका अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन पत्रकाची जाहीर होळी करण्यात आली. व अशा आयुक्तांची हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली त्यावेळी झालेल्या सभेत अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हा सचिव काँ अमृत महाजन तसेच ॲक्टिव अंगणवाडी चॅनलच्या निर्मात्या दिग्दर्शक पुष्पावती मोरे. युनियनच्या तालुका अध्यक्ष वत्सला पाटील यांनी मार्गदर्शन केले व त्यांनी आपल्या संपाबाबत वस्तूस्थिती मांडली.
*आगामी काळात जामनेर येथे महिला बालकल्याण मंत्री ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालय कम निवासस्थान जामनेर येथे मोर्चा नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे*. महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मागण्या मान्य करून त्यांचा व अंगणवाडीतील लाभार्थी यांचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी सर्व श्रीमती ठगूबाई पाटील, शारदा पाटील, लताबाई पाटील, शीतल पाटील, यशोदा धनगर, पूनम धनगर, संध्या पाटील, रेखा पाटील, अनिता सावळे, पारवता साळुंखे, उज्वला बोरसे, उषा करंदीकर ,रंजना पाटील ,ज्योती चौधरी, शैलाबाई पाटील, जिजाबाई सोनवणे, शोभा नेवे, पद्मजा नेवे, दीपिका पाटील, आदी ६०/७० सेविका, मदतनीस हजार होत्या उपस्थित होत्या
No comments:
Post a Comment