शेतमजुर बचाव देश बचाव मोहिम..तीन तालुक्यातील धरणे आंदोलने..यशस्वी..
जळगाव, प्रतिनिधी .. गेल्या दहा वर्षापासून शेतमजूर कष्टकरी असंघटित कामगार, जंगल गायरान धारक, बेघर यांच्या प्रश्नाकडे केंद्रीय सत्ताधाऱ्यांचे संपूर्ण दुर्लक्ष असून फक्त धनदांडगे उद्योगपती यांच्यासाठी सरकार काम करीत आहे म्हणून मजुरांच्या विविध मुद्द्यांना घेऊन शेतमजूर बचाव देश बचाव मोहीम महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन व भारतीय खेत मजदूर युनियन ने दिलेल्या आदेशानुसार मार्च ते 23 मार्च 2024 काळात देशव्यापी मोहीम व शेतमजूर यांच्या प्रश्नांचा पाठपुराव्यासाठी देशभर आंदोलने करण्याची सुरुवात केली आहे.
त्यानुसार जळगाव जिल्ह्यातही 18 ते 20 मार्च 2024 काळात चोपडा, अमळनेर व जळगाव या तीन तालुक्यात या मोहिमेअंतर्गत त्या त्या ठिकाणच्या तहसीलदार कार्यालयांवर धरणे व निवेदन देणे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चोपडा, अमळनेर, जळगाव येथील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे पालन करून आपले कार्यक्रम करा अशी संमती दिली, त्यानुसार 18 मार्च रोजी चोपडा येथे तहसीलदार कार्यालयावर शेतमजूर युनियन तर्फे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना 9 मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. त्या मागण्यात म्हटले आहे की श्रावणबाळ आदी योजनात कमाल वयाची मर्यादा 60 वर्षे असावी तसेच खोट्या व तकलादू कारणे दाखवून लाभार्थी वयोवृद्ध दिव्यांग यांना लाभ नाकारण्यात येऊ नये वयासाठी मेडिकल सर्टिफिकेट गृहीत धरावे जंगल गायरान जमिनीवरील अतिक्रमण कायम करावी. सर्वांना आरोग्य हक्क म्हणून सरकारी दवाखाने यात औषधी साधने व तज्ञ मेडिकल अधिकारी यांचा समावेश व्हावा शिक्षण क्षेत्रातील विषमता दूर करण्यासाठी शाळा अंगणवाडी डिजिटल करावी. अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत जे लोक सुटून गेले त्यांची फेर चौकशी व्हावी त्यांच्या समावेश व्हावा आदि मागण्यांचे निवेदन आयटक संपर्क कार्यालयात मीटिंग घेण्यात येऊन तयार करण्यात आले.
*** त्यावेळी लालबावटा शेतमजूर युनियनचे संस्थापक नेते दिवंगत कॉम्रेड स ना भालेराव यांच्या पंचविसाव्या स्मृतिदिनानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेला काँ. वासुदेव कोळी यांनी माल्यार्पण केले तसेच धुळे जिल्ह्याचे शेतमजुर नेते एडवोकेट का मदन परदेशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्यानंतर चोपडा तहसीलदार कार्यालयावर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी शेतमजूर नेते कॉम्रेड अमृत महाजन शेतमजूर युनियन चे जिल्हा सचिव कॉम्रेड वासुदेव कोळी यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन केले त्यावेळी चोपडा तहसीलदार यांना भाऊसाहेब थोरात यांना निवेदन सादर केले त्यात सर्वश्री कॉम्रेड इरफान मणियार, जिजाबाई राणे, शशिकला निंबाळकर, शोभाबाई देशमुख, सुरेश भिल्ल, भगवान भिल्ल, सिंधुबाई भिल, गणेश महाजन, चंद्रकला माळी, संतोष कुंभार, सखुबाई पारधी, दुर्योधन भिल्ल, खैरूनिसा शेख, उषाबाई वाघ आदींनी निवेदन सादर केले. अमळनेर येथे शेतमजुर कार्यकर्त्यांनी जमून दुपारी साडेबारा वाजता बैठक लावून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हाध्यक्ष लक्ष्मण शिंदे, तालुका सचिव वाल्मीक मैराळे व शेतमजूर युनियनचे तालुका अध्यक्ष सरफराज शहा यांच्या मार्गदर्शनात शेतमजुरांच्या प्रश्नांवर चर्चा झाली एक निवेदन तयार करण्यात आले. 123 नंबर फ्लॅट मधील रहिवासी व व्यावसायिक प्रयोजनार्थ गेल्या पन्नास वर्षापासून जे लोक राहत आहेत त्यांच्या नावे राहत असलेली जागा करा तसेच कलाली येथील जंगल गायरान जमिनीवरील शेती नावे करा व मोहिमेअंतर्गत शेतमजुरी यांचे नमूद केलेल्या प्रश्नांचे सविस्तर निवेदन तहसीलदार श्री सुराणा यांना सादर करण्यात आले त्यावेळी सर्वश्री कॉमेडी मन्सूर शहा नारायण मैराळे भावना पांचाळ, रंजना पांचाळ, सिताराम वडार, उषाबाई पवार, श्री हरिश पवार ,जायदाबी शहा आदि पदाधिकारी यांचा सहभाग होता. जळगाव येथेही लालबावटा ऑफिस मध्ये आज रोजी कॉम्रेड भास्कर सपकाळे यांच्या पुढाकारात एक वाजता मेळावा घेण्यात आला. त्यावेळी शेतमजुरांमधील बचत गटांच्या महिला प्रतिनिधी ही उपस्थित होत्या भोकर व पाथरी येथील जंगल, गायरान जमिनीवर शेती करणाऱ्यांची नावे शेती करा शेतमजुरांच्या बचत गटांना अंगणवाडीच्या खाऊ शिजवण्याचे कंत्राट पूर्ववत मिळावी. गेल्या दोन वर्षांपूर्वीची बचत गटांची तीन महिन्याची थकीत बिल अदा करा आधी मागण्या व मोहिमेअंतर्गत नमूद सर्व मागण्यांचे सविस्तर निवेदन तहसीलदार श्री पाटील यांना देण्यात आले त्यावेळी सर्व कॉम्रेड बळीराम, धीवर अलका, कोठावदे, गोकुळ कोळी, विजय बाविस्कर, कैलास भिल, शोभा मोठे देवकाबाई शर्मा बेबी कुंभार गुड्डी शेख ,वंदना पाटील मंगल धनगर, वसंत पाटील, सुकलाल मिल, रिजवाना पिंजारी, प्रतिभा पाटील, तसलीम शेख, पंढरी साळुंखे, भास्कर पाटील, भरत बाविस्कर, राजाराम कोळी, लोटन.पाटील, साधना कोळी आदि 50 कार्यकर्ते आले होते या तीनही आंदोलनांना भारतीय "खेत मजूर युनियनचे माजी राष्ट्रीय कौन्सिल सदस्य व जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस अमृत महाजन" यांनी मार्गदर्शन केले .त्यांच्या मार्गदर्शनात मोठे आहे की, गेल्या दहा वर्षात शेतमजुरांच्या आर्थिक सामाजिक धार्मिक जीवनात मोदी सरकारने फार मोठ्या प्रमाणात जवळजवळ केलेली असून त्यांच्या प्रश्नांकडे अजिबात लक्ष देत नाही उलट त्यांच्या हक्क नाकारत आहेत म्हणून शेतमजुरांनी संघटित व्हावे व आगामी 2024 काढा लोकसभा निवडणुकीत भाजप आरएसएस मोदी सरकार हटवावे असे आवाहन केले...
येत्या 23 मार्च रोजी शहीद भगतसिंग स्मृतिदिनानिमित्ताने मीटिंग घेण्यात येणार असून या मोहिमेचे जागरण सुरूच राहणार आहे.
कॉम्रेड अमृत महाजन जळगाव,
+91 98605 20560
No comments:
Post a Comment