Tuesday, 10 December 2024

उत्कृष्ट पत्रकारिता पुस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन !!

उत्कृष्ट पत्रकारिता पुस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन !!


पालघर, प्रतिनिधी : पालघर जिल्ह्यात पत्रकारिता क्षेत्रात वैविध्यपूर्ण वार्तांकन, लेखनासाठी विशेष योगदान दिलेल्या वृत्तपत्रीय/नियतकालिन (प्रिंट मीडिया) पत्रकारांना पालघर जिल्हा पत्रकार संघातर्फे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. यासाठी समाजाभिमुख व प्रशासनाला दखल घ्यायला भाग पाडणाऱ्या दखलपात्र लेखन केलेल्या पत्रकारांना या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील तीन पत्रकारांना पत्रकारिता पुरस्कारसाठी निवड केली जाणार आहे. जिल्ह्यातील पत्रकारांनी पुरस्कारासाठी आपले अर्ज/प्रस्ताव "पालघर जिल्हा पत्रकार संघ" या नावाने पाठवायचे आहेत, :- जिल्हाधिकारी कार्यालय, पत्रकार कक्ष, दालन क्रमांक ०६, तळमजला, आवक जावक कक्षासमोर, कोळगाव जिल्हा मुख्यालय संकुल येथे शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर २०२४ पर्यंत सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत सादर करावेत. अधिक माहितीकरिता - ९५४५८२३२५५/९८९२८०५४०५ या क्रमांकावर संपर्क करावा.

आवेदन करणाऱ्या पत्रकाराने आपली माहिती असलेला परिपूर्ण अर्ज, नावासहित प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची मूळ कात्रणे, वृत्तपत्रीय ओळखपत्र, पुरस्कार स्वीकारण्याचे स्वघोष्णपत्र प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज विचारात घेतला जाणार नाही याची नोंद घ्यावी. पुरस्कार निवडीचा सर्वाधिकार पुरस्कार निवड समितीच्या अधीन राहील.

नियम व अटी
१) पत्रकाराचे कार्यक्षेत्र पालघर जिल्हा असावे.
२) पत्रकार हा शासनमान्य नोंदणीकृत वृत्तपत्राचा पत्रकार, वार्ताहर, प्रतिनिधी असावा.
३)किमान तीन वर्षापेक्षा जास्तचा अनुभव असावा.
४) पत्रकारावर कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल नसावा.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...