Monday, 31 March 2025

कॉस्मोग्लोबल मानवाधिकार संघटन प्रमुख नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसांपासून कार्यकर्त्याच्या भेटीला सुरुवात !!

कॉस्मोग्लोबल मानवाधिकार संघटन प्रमुख नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसांपासून कार्यकर्त्याच्या भेटीला सुरुवात !!

** मानवतावादी विचारांसह मानवी हक्कांचा प्रसार करण्याचे प्रयत्न

ठाणे, (शांताराम गुडेकर) :
               कॉस्मोग्लोबल ह्युमन राईट्स विचार संघम असोसिएशन ऑफ इंडिया संघटन प्रमुखांची अंबरनाथ शहराला विशेष भेट लाभली. नवीन वर्षाच्या सुरुवातीला, अंबरनाथ नगर कार्यकारिणी सदस्यांच्या वतीने आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री.बाळासाहेब शिंदे यांच्या पुढाकाराने जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी अंबरनाथ येथील बुद्ध विहार येथे आदरांजली वाहण्यात आली. नवीन वर्षाच्या सुरुवातीला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे आणि ओळखपत्रे देण्यात आली आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब शिंदे हे देखील उपस्थित होते. श्री.डोमिनिक फ्रान्सिस, महाराष्ट्र सचिव, श्री.बंधू नागवंशी- अंबरनाथ शहराध्यक्ष, श्री.वेंकटेश गट्टेगला- उपाध्यक्ष अंबरनाथ, श्री.राजू रामप्पा म्हात्रे- तालुका अध्यक्ष, श्री.मंगल देवराम, श्री.मिश्राजी सर, श्रीमती लक्ष्मी नारायण कोळी, श्रीमती संतोकृष्ण कोळी, जागृती चंद्रशेखर गट्टेगला कॉलियर, गणपती कॉलियर शहर समितीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रम चे आभार प्रदर्शन राष्ट्रीय सचिव मच्छिंद्र मोरे यांनी केले.
            अंबरनाथच्या नागरिकांनी मोठी कामगिरी केली आहे.आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सहभागींना मार्गदर्शन करताना संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री.बाळासाहेब शिंदे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले आणि राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश कांबळे यांनी कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले.आज मराठी नववर्षाच्या सुरुवातीला अंबरनाथ शहराध्यक्ष श्री.बंडू नागवंशी यांनी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री‌बाळासाहेब शिंदे यांच्यासह संघटनेच्या कार्यकर्त्यांना एकत्र केले आणि त्यांना नवीन वर्षाच्या सुरुवातीला ओळखपत्रे आणि नियुक्तीपत्रे दिली. त्यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली आणि जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी विचारांसह मानवी हक्कांचा प्रसार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. लोकांमध्ये मानवता पसरावी म्हणून आम्ही भारतीय संविधानानुसार प्रत्येक गावातील लोकांपर्यंत मानवी हक्क आयोगाचे मानवी हक्क पोहोचवत आहोत. देशाच्या स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनंतरही लोकांना मानवाधिकार आयोगाबद्दल माहिती नाही. लोक मानवी हक्क विसरले आहेत. म्हणूनच आपण कोणाची बहीण, मुलगी किंवा सून हे ओळखत नाही. पिडीत महिलांची संख्या वाढत आहे. म्हणूनच, संस्थेच्या वतीने आम्ही संपूर्ण भारतात मानवी हक्क, सुरक्षा आणि स्वातंत्र्याचे उदाहरण पसरवण्यात सहभागी आहोत आणि लोकांना त्यात सामील होण्याचे आवाहन करतो असे सांगितले. अधिक माहितीसाठी कॉस्मोग्लोबल मानवाधिकार विचार संगम असोसिएशन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या बाजूला, वैष्णवी सोसायटी गेट समोर, करुणा को.आप हौ.सो, श्री हरी कॉम्प्लेक्सच्या जवळ, छत्रपती राजर्षी शाहू महाराज नगर, तिसगाव पाडा कल्याण पूर्व ४२१३०६.भ्रमणध्वनी क्रं.९९६९११७७३८ ईमेल-cgmanavadhikar022@gmail.com येथे संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष डॉ प्रकाश कांबळे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा प्रा. वसंत कानेटकर लिखित "इथे ओशाळला मृत्यू रंगमंचावर" !!

प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा प्रा. वसंत कानेटकर लिखित "इथे ओशाळला मृत्यू रंगमंचावर" !! दादरच्या छ. शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे ...