Sunday 30 September 2018

निंभोरा येथे रस्त्यावर बनला तलाव, नागरिक हैराण.

निंभोरा येथे गटारीचे घाणपाणी रस्त्यावर.
नागरिक त्रस्त.

निंभोरा-
दस्तगिर खाटीक -

            प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी देशभरात स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन करत आहे मात्र निंभोरा निंभोरा येथे ग्राम  पंचायतिने याला प्रतिसाद दिलेला दिसत नाही वार्ड क्र .६ स्टेशन परीसरातील नविन निर्माणाधीन गटारीमुळे घाण पाण्याचे भले मोठे डबके तयार झाले असुन त्यामुळे रहदारीला अडथळा होत आहे व दुर्गंधीयुक्त घाण पाण्यामुळे नरकयातना भोगाव्या लागत असुन आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
      भारत स्वच्छता अभियाना अंतर्गत संपुर्ण देशासह राज्यात अनेक सामाजीक संस्था व राजकीय पुढारी स्वच्छता अभियान राबवत आहे.मात्र स्टेशन परीसरात गटारीचे  सांडपाणी कोणताही विचार न करता रस्त्यात सोडल्यामुळे पाण्याचे डबके साचुन डासांची समस्या प्रंचड वाढली असुन मोठा त्रास सहन करावा लागत आहे
        ग्राम पंचायत प्रशासनाच्या   नियोजनशुन्य कारभारामुळे   आरोग्याच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असुन जनतेचे हाल होत आहे तरी संबधीत वरीष्ठअधिकार्यानी लक्ष द्यावे अशा मागणी परीसरातील नागरीकांनी घेतली असुन यापुढे आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल असा इशारा दिला आहे.

No comments:

Post a Comment

लग्नाची अंतिम बोलणी करण्याआधी पालकांनी मुलाकडे प्रेम प्रकरणाबाबत चौकशी करावी !!

लग्नाची अंतिम बोलणी करण्याआधी पालकांनी मुलाकडे प्रेम प्रकरणाबाबत चौकशी करावी !! कल्याण, प्रतिनिधी :- पालकांनी लग्नाची बोलणी अंति...