Saturday 29 September 2018

टिटवाळयात शौर्य दिवस साजरा करण्यात आला

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतिने "शौर्य दिवस(सर्जिकल स्ट्राईक दिवस-२९ सप्टेंबर)" साजरा करण्यात आला.

  मांडा-टिटवाळा परिसरातील भारतीय सैन्यातील सैनिक,माजी सैनिक अाणि त्यांच्या कुटुंबियांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट व गौरव केला.

टिटवाळा - २९/९/१८

            अाज दि.२९ सप्टेंबर रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला. भारताची मान संपुर्ण जगामध्ये अभिमानाने उंचावली. या अभिमानास्पद व ऐतिहासिक कामगिरी बद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या वतिने संपुर्ण देशभर  "सर्जिकल स्ट्राईक-२९ सप्टेंबर हा दिवस  "शौर्य दिवस"  म्हणुन साजरा करण्यात अाला.
           या वर्षीपासुन दरवर्षी २९ सप्टेंबर हा दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा करण्यात येणार अाहे. अापल्या देशाच्या बहुमोल स्वातंत्र्याचे अाणि सार्वभौमत्वाचे प्राणपनाने रक्षण करणारा, अापत्तीच्या काळात अापदग्रस्त देशबांधवांच्या मदतीलाही धावुन जाणारे, उन्हातान्हाची,थंडी पावसाची वा कोणत्याही संकटाची पर्वा नकरता अापली कर्तव्ये चोखपने बजावणारे देशाचे बहाद्दुर सैनिक हे अापल्यासाठी अादराचा अाणि अभिमानाचा विषय अाहे.
            त्यामुळे या शौर्य दिनाच्या औचित्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे,भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेशजी टिळेकर यांच्या अादेशानुसार अाणि भारतीय जनता युवा मोर्चा कल्याण जिल्हाध्यक्ष माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर,भाजपा जिल्हा सचिव तथा उपमहापौर सौ.उपेक्षा शक्तिवान भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली अाज मांडा-टिटवाळा परिसरातील भारतीय सैन्यातील  सध्या कार्यरत असनारे सैनिक नवनाथजी लावंड, माजी सैनिक बबनजी केदारे, रमापती त्रिपाठी, तातेराव फड, एकनाथ सावंत, बाजीराव महाडिक, कोनकर अाप्पा अाणि राजेंद्रजी खरात यांच्या घरी भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी यांनी उपहापौर सौ.उपेक्षाताई भोईर यांच्यासहित  सदिच्छा भेट दिली व त्यांच्या हस्ते " भारतीय सैन्यातील सैनिक/माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबांचा यथोचित सन्मान अाणि गौरव करण्यात अाला. त्यांच्याशी संवाद साधण्यात अाला. तसेच सैनिकानी सुध्दा सैन्यामध्ये असतानाच्या विविध अाठवणींना उजाळा दिला.पहिल्यांदा या देशामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या मुळे "वन रॅन्क वन पेंशन" योजनेच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात पेंशन ची रक्कम वाढल्याची भावना व्यक्त करण्यात अाली.        पहिल्यांदाच अशा प्रकारचा कार्यक्रम सुरु केल्याचे व अामच्या घरी येऊन सदिच्छा भेट देऊन, अामच्याशी संवाद अाणि कुटुंबासहित गौरव केल्यामुळे हा अतिशय स्तुत्य कार्यक्रम चालु केल्याचे समाधान व्यक्त केले.
          याप्रसंगी उपमहापौर सौ.उपेक्षाताई भोईर, मोहने-टिटवाळा मंडळ मा.सरचिटणीस शक्तिवान भोईर, युवा मोर्चा प्रदेश सचिव परेश गुजरे, पुराणिक सर, अनिलजी फड, युवा मोर्चा जिल्हा सचिव देवेंद्र सावंत, जिल्हा सचिव वैभव पुजारी, जिल्हा उपाध्यक्ष गुरुनाथ भगत, सुरज गोरे, समाधान पाटील अाणि भुपेंद्र ससाणे यांची उपस्थिती व सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

लग्नाची अंतिम बोलणी करण्याआधी पालकांनी मुलाकडे प्रेम प्रकरणाबाबत चौकशी करावी !!

लग्नाची अंतिम बोलणी करण्याआधी पालकांनी मुलाकडे प्रेम प्रकरणाबाबत चौकशी करावी !! कल्याण, प्रतिनिधी :- पालकांनी लग्नाची बोलणी अंति...