"पत्रकाराच्या नजरेतून ..."
*महाराष्ट्रातील राजकारणात अव्वल जाणता राजा शरदचंद्रजी पवार*
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला आज 21 वर्ष पूर्ण होत आहे. हा पक्ष 10 जून 1999 रोजी स्थापन झाला. या पक्षाचे सर्वेसर्वा व ज्यांच्यामुळे पक्ष भरारी घेत आहे त्यांची जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे. कारण शरदचंद्रजी पवार साहेब हे महान व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभलेलं आहे .
राजकारण ,समाजकारण,कृषी ,क्रीडा ,शिक्षण ,क्रिकेट , कुस्ती,अश्या विविधांगी अंगाने त्यांनी उल्लेखनीय व अविरत काम केले. कॉलेज जीवनापासून त्यांनी राजकारणात स्वतः ला झोकून दिले ,त्यांचे कर्तृत्व पाहून स्व.यशवंतराव चव्हाण साहेबानी त्यांना हात दिला , मार्गदर्शन पर धडे दिले. पवार साहेब हे यशवंतरावजीचे मानस पुत्र पण या पुत्राने आपल्या कर्तुत्वाने मानस पित्याचे ही नाव उज्वल केले.पवार साहेबानी समग्र घराण्याला एक आदर्श घालून दिला. काम हाच कामाचा गुरू आहे जीवन कोणाला ही फुकट कधीच देत नाहीत. त्यासाठी मेहनत करावी लागते. जिंकणे याचा अर्थ असा कधीच नसतो की प्रत्येक वेळी तुम्ही विजय मिळवलाच पाहिजे ,पण त्याचा शेवट मात्र तुमच्या विजयात झाला पाहिजे.
पवार घराण्यातील कोणतीही व्यक्ती हि रिकामटेकडी नाही ,उच्चविद्या विभूषित असल्याने अनेक प्रकारच्या बाबी प्रत्येकाने हाताळल्याआहेत . अनेक संस्थाचे जाळे त्यांनी निर्माण केले ज्यात प्रसारमाध्यमे ,कृषी प्रतिष्ठान ,विद्या प्रतिष्ठान ,साखर कारखानदारी , बँकिंग ,व बांधकाम प्रोजेक्ट ,अश्या विविध बाबीचा समावेश आहे ,, त्याचे व्यवस्थापन करणे ,आणि दुसऱ्या बाजूने राजकारण करीत राहणे असे समांतरपणे काम करून पक्षाला मजबूत करण्याची किमया यांनी केली. पवार साहेब यांची काम करण्याची पद्धत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध असते. कोणतेही काम करताना विचारपूर्वक करतात. तोंडाचा कॅन्सर झाल्या नंतरसुध्दा व अन्न पदार्थ गिळता येत नसतानाही ते बेडवर कधीच राहिले नाहीत.किंवा उशिरा कधी उठले नाहीत. वाचण्यात आलेला एक किस्सा असा की,
माजी सहकार मंत्री कै प्रताप सिंह जी मोहिते पाटील साहेब यांच्या पत्नी आदरणीय पद्मजा देवी ज्यांना आम्ही आई साहेब म्हणून आमच्या भागात संबोधले जाते , त्यांनी साहेबाचे बद्दल किस्सा सांगितला होता ,साहेबानी निरोप दिला की मी सकाळी नाश्त्याला तुमच्या कडे येतो ,,फक्त अंडा आम्लेट बनवा ,, सकाळी 7 वाजता साहेब आले ,, आम्लेट चा एक एक तुकडा तोंडात अक्षरशः हाताने ते ढकलत होते , त्या स्किन मधून आलेले रक्त ते एका हाताने पुसत होते ,, साहेब कधी वेदनेवर रडले नाहीत त्यांनी त्यावर मात केली ,बोलताना त्यांचा आवाज स्पष्ट येत नव्हता पण ते अखंड बोलत राहिले आज साहेब काय म्हणतात हे स्पष्ट पणे समजते ,, पायाला जखम असताना सुध्दा हा नेता पूरपरिस्थिती पाहण्यासाठी मैदानात उतरला. निवडणुका चालू असताना थेट उदयनराजे ना अंगावर घेताना ते भर पावसात भिजले. हि एक न विसरणारा अविस्मरणीय ठेवा आहे .साहेब महान नेतृत्वा पैकी एक आहेत.
आज कोणत्याही निवडणुका नसताना 80 वर्षाचा हा अतुलनीय योद्धा कुटुंबकर्त्याच्या भूमिकेतून कोकण दौऱ्यावर शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेत आहेत ,सकाळी 8 30 ते रात्री 10 पर्यंत आढावा घेत रत्नागिरी ,रायगड या भागात 2 दिवसाचा दौरा करणारे साहेब फक्त पश्चिम महाराष्ट्रा पुरतेच आहेत असे म्हणणाऱ्याच्या तोंडात एक चपराक आहे. मराठवाडा भूकंप असो ,की सांगलीचा पूर किंवा गुजरात भूकंप ,अथवा आत्ता आलेले निसर्ग चक्रीवादळ , या संकटाला साहेब भिडतात हेच यातून दिसून आले आहे. जाणता राजा असे लोक का म्हणतात याचे हे उत्तर आहे,त्याचे जाणते राजकारण आहे ,म्हणून लोक म्हणतात *साहेब मोडला जरी संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त एकदा लढ म्हणा* राज्य सरकारच नाही तर केंद्र सरकारचे ही बळ तुमच्या मागे उभे करू हे आश्वासक शब्द साहेबाचे आहेत,
अशा या महाराष्ट्रातील राजकारणात अव्वल जाणता राजा शरदचंद्रजी पवार यांना मानाचा मुजरा.
पत्रकाराच्या नजरेतून मला व माझ्या लेखणीला बळ मिळाले .
जय महाराष्ट्र । जय हिंद ॥
अरूण ठोंबरे
पत्रकार /संपादक
9322107521/9527154112

No comments:
Post a Comment